TRENDING:

'ती' गोष्ट महागली! कल्याण-डोंबिवलीकरांच्या दैनंदिन खर्चात मोठी वाढ, कारण आहे...

Last Updated:

Dombivli News: डोंबिवलीत रिक्षाचालक मीटर न वापरता मनमानी भाडे आकारतात. प्रवाशांना जास्त पैसे द्यावे लागतात तसेच शेअर रिक्षा नियमही पाळले जात नाहीत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
डोंबिवली : डोंबिवलीतही रिक्षा चालवताना मीटरचा वापर महत्त्वाचा असला तरी बहुतांश रिक्षाचालक मीटर न लावता मनमानी भाडे आकारतात. प्रवाशांना रिक्षाचालक जे सांगतील तेच भाडे द्यावे लागते. त्यामुळे मीटर ही फक्त शोभेची वस्तू बनली आहे.
News18
News18
advertisement

मीटर न वापरता रिक्षा भाडे वाढवले

कल्याण-डोंबिवली परिसरात रिक्षा बहुतेक वेळा शेअर पद्धतीने चालवल्या जातात. त्यामुळे ठाणे किंवा इतर शहरांप्रमाणे येथे मीटरची सोय प्रवाशांना मिळत नाही. प्रवाशांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे आणि कल्याण आरटीओ अधिकाऱ्यांनी कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

जर प्रवाशांना रिक्षाचालक मनमानी भाडे सांगत असेल किंवा मीटर न लावत असेल किंवा भाडे नाकारत असेल, तर त्याबाबत कल्याण आरटीओच्या मोबाइल नंबरवर तक्रार करता येते. मात्र, सामान्य प्रवाशांना हा नंबर माहिती नसल्यामुळे तक्रार करणे अवघड जाते. त्यामुळे प्रवाशांना त्रास होतो आणि जनजागृती करणे आवश्यक आहे असे ते म्हणतात.

advertisement

रिक्षाचालक मीटर न वापरण्याची कारणे अशी सांगतात की, लांबचे भाडे हवे, मनमानी भाडे आकारायचे, कधी कधी हाफ मीटर टाकायचे, जेणेकरून तांत्रिक बिघाड असल्याचे दाखवता येईल. परंतु नियमानुसार प्रवाशाने मीटर वापरायला सांगितल्यास रिक्षाचालकाला मीटर लावून ठरलेले भाडे आकारणे बंधनकारक आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
स्वप्नांचा झाला 'लाल चिखल', टोमॅटोला भाव नसल्यामुळे 2.50 लाखांचं नुकसान, Video
सर्व पहा

कल्याण आरटीओ हद्दीत नियमाचे पालन फारसे होत नाही. शेअरिंग रिक्षांमध्ये नियमाने तीन प्रवासी असणे अपेक्षित असताना, पाच प्रवासी घेतले जातात. पहिल्या टप्प्याचे दरपत्रक शेअरसाठी 12 रुपये आणि मीटरसाठी 26 रुपये आहे, तरीही रिक्षाचालक शेअरला 15-20 रुपये घेतात.

advertisement

मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
'ती' गोष्ट महागली! कल्याण-डोंबिवलीकरांच्या दैनंदिन खर्चात मोठी वाढ, कारण आहे...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल