येत्या मंगळवारी (27 जानेवारी 2026) जलशुद्धीकरण केंद्रावरील विद्युत आणि यांत्रिकी उपकरणांची अत्यावश्यक देखभाल- दुरूस्तीची कामे हाती घेतले जाणार आहे. सकाळी 10:00 ते सायंकाळी 06:00 वाजेपर्यंत (8 तास) महानगर पालिकेच्या बारावे, मोहिली, नेतिवली आणि टिटवाळा जलशुद्धीकरण केंद्रामधून कल्याण पूर्व आणि पश्चिम, डोंबिवली पूर्व आणि पश्चिम सोबतच कल्याण ग्रामीण देखील या भागातही पाणी पुरवठा बंद राहणार आहे. कल्याण ग्रामीणमध्ये (मांडा- टिटवाळा, वडवली, आंबिवली, टिटवाळा, शहाड आणि इतर भागातील गावं) पाणी पुरवठा उपलब्ध होणार नाही.
advertisement
महानगरपालिकेकडून नागरिकांना असे आवाहन करण्यात आले की, येत्या सोमवारीच नागरिकांनी आवश्यक तितका पाणी पुरवठा भरून ठेवायचा आहे. कल्याण- डोंबिवलीसह कल्याण ग्रामीण भागातील नागरिकांनाही शटडाऊनचा फटका बसणार आहे. त्यामुळे संपूर्णच कल्याण- डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात तीव्र पाणीकपातीची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेकडून या बंदच्या काळात विद्युत यंत्रणा पंप, यांत्रिक उपकरणे, तांत्रिक प्रणालीची तातडीची दुरूस्ती आणि देखभाल करण्यात येणार आहे. सुरळित आणि सुरक्षित पाणी पुरवठ्यासाठी संपूर्ण यंत्रणा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
शट डाऊनशिवाय पर्याय नसल्यामुळे केडीएमसीने पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकेकडून नागरिकांना पूर्वीच पाणी येणार नसल्याचा सतर्कतेचा इशारा देत पाणी साठवणूक करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
