बैठकीला उपस्थित न राहिल्यास पक्ष विरोधी काम केल्याने कारवाई केली जाईल, असा इशारा या नोटीसमधून देण्यात आला आहे. ठाकरे गटाकडून निवडून आलेले नगरसेवक मधुर म्हात्रे आणि किर्ती ढोणे यांना ही नोटीस देण्यात आली आहे. दोन्ही नगरसेवक घरी उपस्थित नसल्यामुळे मधुर म्हात्रे यांचे वडील आणि किर्ती ढोणे यांच्या बहिणीला ही नोटीस देण्यात आली आहे.
advertisement
फोडाफोड होऊ नये म्हणून ठाकरे गटाने त्यांचे 9 आणि मनसेने त्यांचे 7 नगरसेवक अज्ञातस्थळी ठेवले आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे 11 आणि मनसेचे 5 नगरसेवक निवडून आले आहेत, तर मनसेचे 2 नगरसेवक ठाकरेंच्या चिन्हावर निवडून आले आहेत. पण ठाकरेंच्या 11 पैकी 9 नगरसेवकांनाच अज्ञातस्थळी ठेवलं गेलं आहे, त्यामुळे उरलेले 2 नगरसेवक हे मधुर म्हात्रे आणि किर्ती ढोणे आहेत का? आणि ते नेमके कुठे आहेत? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेनेचे 53 आणि भाजपचे 50 नगरसेवक निवडून आले आहेत. सत्ता स्थापन करण्यासाठी 62 चा आकडा गाठणं गरजेचं आहे, त्यामुळे ठाकरे गट आणि मनसेचे नगरसेवक गेम चेंजर ठरणार आहेत. मनसेसोबत युती करून सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे.
कल्याण-डोंबिवलीमध्ये महायुतीचा महापौर होईल, पण पहिली अडीच वर्ष महापौरपद भाजपला मिळालं पाहिजे, अशी मागणी भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केली आहे. तसंच मनसे आणि ठाकरे गटाच्या काही नगरसेवकांनी आमच्यासोबत संपर्क साधल्याचा दावाही नरेंद्र पवार यांनी केला आहे.
