संक्रांतीसाठी केला जाणारा तिळगुळ, तिळाची पोळी, तीळ लावून केलेली भाकरी या सगळ्यामागचं विज्ञान समजून घेणं गरजेचं आहे. दिवसभरासाठी शरीराला ऊर्जा समृद्ध अन्नाची आवश्यकता असते, म्हणून या सणाला तेल, तूप, तीळ, गूळ आणि खिचडी यासारखे पदार्थ वर्षानुवर्ष आवर्जून केले जातात. हे सर्व पदार्थ वात कमी करण्यास मदत करतात. या पदार्थांच्या नैसर्गिक उर्जेनं थंडीपासून रक्षण होतं.
advertisement
Face Wash : जुनं ते सोनं, महाग फेसवॉश विसरा, चमकदार त्वचेसाठी घरीच बनवा फेसवॉश
हवामानानुसार आपल्या सवयी आणि वर्तन जुळवून घेणं ही दीर्घायुष्य आणि आरोग्याची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे
हा ऋतू आरोग्यासाठी का चांगला मानला जातो समजून घेऊया. 14 जानेवारी म्हणजे महिन्याचा मध्य आणि हा काळ हिवाळ्याच्या ऋतूचा मध्य मानला जातो. हा ऋतू जसजसा पुढे जातो तसतसा अग्निप्रवणता अधिक तीव्र होते. यामुळे भूक देखील वाढते.
या काळात, निरोगी आणि पौष्टिक आहार घेतल्यानं आपल्या शरीराला पोषक घटक चांगल्या प्रकारे शोषण्यासाठी मदत होते. या काळात निरोगी, संतुलित आहार आणि नियमित आहार घेतल्यानं वर्षभर मजबूत रोगप्रतिकारक शक्ती मिळते. ज्यामुळे शरीर आजारांशी, संक्रमणाशी लढण्यासाठी तयार होतं.
मकर संक्रांतीच्या निमित्तानं तीळ, गूळ, शेंगदाणे, दूध आणि त्यापासून बनवलेले पदार्थ खाण्याची परंपरा आहे. हे सर्व चविष्ट आणि सहज पचण्याजोगे आहेत आणि ते औषध म्हणून देखील काम करतात. तीळ आणि गुळात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. गुळामुळे रक्त वाढतं आणि पचनाला मदत होते.
थंड हवामानातही पाणी नेहमीसारखंच पित राहा, दररोज पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे.
जैविक घड्याळ हवामानातील बदलांशी जुळवून घेण्यास सुरुवात करतं. झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा देखील नियमित होतात. नियमित वेळेवर झोपलात आणि उठलात आणि संतुलित आहार आणि जीवनशैली आरोग्यासाठी महत्त्वाची आहे.
प्रकृतीसाठी फायदेशीर पदार्थ आणि सवयी- गहू, तांदूळ, बार्ली आणि बाजरी, तूप , तीळ, तेल, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, डाळी
सवयी - गरम आणि ताजं अन्न खा. भूक लागल्यावरच खा. जेवणाची वेळ निश्चित करा. आलं, लसूण, काळी मिरी, मिरची, हिंग आणि ओवा आहारात असू द्या.
उच्च रक्तदाब आणि शुगर असलेल्यांसाठी महत्त्वाची माहिती -
कोणतंही औषध बदलण्यापूर्वी नेहमीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
वातामुळे रक्तदाब वाढतो.
अग्निच्या प्राबल्यतेमुळे, अयोग्य आहारामुळे साखरेचं असंतुलन होऊ शकतं.
सकाळी आणि संध्याकाळी खूप थंडी असताना बाहेर जाणं टाळा.
रक्तदाब नियंत्रणात असतानाच तिळाच्या तेलानं मालिश करा.
जास्त ताण आणि राग टाळण्यासाठी योग आणि ध्यान करा.
निद्रानाशावर उपचार करा. झोपेशी तडजोड करू नका. मर्यादित प्रमाणात तूप आणि तेल घ्या.
Lip Balm : कोरड्या ओठांसाठी उपयुक्त, केशर लिप बाम ठेवेल ओठ गुलाबी, मुलायम
हलकं आणि सहज पचणारं अन्न खा. शिळं, तळलेलं आणि जड पदार्थ खाणं टाळा. तीळ-गुळाची मिठाई मधुमेह असलेल्यांनी खाऊ नये. मीठ प्रमाणात खा. खूप वेळ उपाशी राहू नका. निरोगी दैनंदिन दिनचर्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. सकाळी शक्यतो ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी उठण्याचा प्रयत्न करा. कोमट पाणी प्या. सूर्याकडे पहा. दररोज तीळाच्या तेलानं स्वतःला मालिश करा. कोमट पाण्यानं आंघोळ करा. डोकं, कान, नाक आणि पाय यांच्याकडे विशेष लक्ष द्या. क्षमतेनुसार व्यायाम करा. दिवसा झोपणं टाळा. सूर्यनमस्कार, भस्त्रिका आणि कपालभाती सारखी योगासनं खूप फायदेशीर आहेत. सूर्यास्तानंतर हलकं, गरम जेवण घ्या. रात्री उशिरापर्यंत जागं राहणं टाळा.
या प्रकारचं अन्न टाळा -
- थंड, कोरडं आणि शिळं अन्न, थंड पेयं आणि जास्त उपवास करणं टाळा.
- भूक मारू नका.
- चणे आणि वाटाणे यांसारखे वात वाढवणारे पदार्थ मर्यादित खा.
