जवसाला सुपरफूड म्हटलं जातं. तुम्ही सलग पंधरा दिवस कोमट पाण्यासोबत भाजलेले जवस खाल्ले तर तुमच्या शरीरात अनेक बदल दिसून येतील. जवसाच्या बियांमधे ओमेगा-३ फॅटी एसिड, फायबर, प्रथिनं आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, यामुळे शरीराचं आतून पोषण होतं.
Hair Care :चिकट केसांना वैतागलात ? चिंता सोडा, हेअरमास्क वापरा, केस होतील मुलायम
advertisement
बद्धकोष्ठता आणि पचन - भाजलेल्या जवसामुळे, फायबर पचन सुधारण्यास मदत होते. दररोज जवस खाल्ल्यानं बद्धकोष्ठता दूर होते, पोट स्वच्छ राहतं आणि अपचन आणि गॅस कमी होतो. यासाठी, एक चमचा भाजलेले जवस चावून घ्या आणि नंतर कोमट पाणी प्या.
आतड्यांचं आरोग्य - दहा-पंधरा दिवस नियमितपणे जवसाचं बी खाल्ल्यानं चयापचय सुधारतं. यामुळे आतड्यांमधे चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीला मदत होते आणि आतड्यांचं आरोग्य मजबूत केल्यानं उर्जेची पातळी सुधारते.
महिलांसाठी हार्मोन्स संतुलनासाठी उपयुक्त - अळशीच्या बियांमधील म्हणजेच जवसामधील लिग्नान्स हार्मोन्स संतुलनात भूमिका बजावतात. नियमित खाल्ल्यानं अनियमित मासिक पाळी सुधारण्यास मदत होऊ शकते.
यामुळे रजोनिवृत्तीच्या मूड स्विंग, हॉट फ्लॅश या लक्षणांपासून देखील आराम मिळू शकतो. हा परिणाम हळूहळू होतो, म्हणून नियमित वापर आवश्यक आहे.
Hair Care: केसांच्या वाढीसाठी अंतर्गत पोषण महत्त्वाचं, हेअर केअर टिप्स नक्की वाचा
वजन कमी करण्यास उपयुक्त - अळशीच्या बियांमधे भरपूर फायबर असतं, यामुळे जास्त काळ पोट भरलेलं ठेवण्यास मदत होते. यामुळे जास्त अन्न खाल्लं जात नाही. ज्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत देखील मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यापूर्वी जवस खाणं अधिक फायदेशीर आहे. जवसाच्या बिया हलक्या भाजून घ्या आणि हवाबंद डब्यात साठवा. दररोज एक ते दोन चमचे घ्या. जास्त प्रमाणात जवस खाऊ नका, कारण यामुळे पोट फुगू शकतं किंवा उष्णता वाढू शकते.
