घरीच घ्या काळजी
घरच्या घरी हा त्रास कमी करण्यासाठी अंबवलेल्या गोष्टी किंवा आंबट गोष्टी खाऊ नये. दही, ताक, लिंबू, लोणचं , इडली, डोसा तसेच वांग, फ्लॉवर , बटाटा या गोष्टी जेवणात कमी खाव्यात. सर्व जॉईंट गरम पाण्याने शेकून काढले तर त्रास कमी होतो. ऊब असलेले ब्लँकेट पायावर ठेवले तर पायाला क्रॅम्प येणार नाही, अशी माहिती गीते यांनी दिली.
advertisement
धक्कादायक! चिमुकल्याच्या घशात अडकलं 1 रुपयाचं नाणं, दुर्बिण सोडली आणि...
'तो' निव्वळ गैरसमज
वात बरा होईल असं जगात कोणतंही तेल नाही. आईनं जखमेवर हात फिरवल्यानंतर बरं वाटतं, तसंच तेल लावल्यानंतरही वाटतं. कोणतंही तेल लावताना त्याची तुम्हाला ॲलर्जी होत नाही ना याची खबरदारी घ्या असा सल्ला डॉ. गीते यांनी दिला.
यापूर्वी सर्वसाधारणपणे चाळीस वर्षांनंतर या आजाराची बाधा होत असे. शहरीकरण आणि बदलत्या जीवनशैलीमुळे तिशी गाठलेल्या व्यक्तींचीही हाडे ठिसूळ होत असल्याचे दिसून येत आहे. प्रामुख्याने सातत्याने खुर्चीत बसून काम करत असल्याने हाडांवर ताण देणारी प्रक्रिया कमी वेळा होते. त्याचबरोबर आहारात जंकफूडचा समावेश आणि मुख्यत: ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता यामुळेही कॅल्शियमची कमतरता भासते.
शिवरायांच्या मावळ्याकडे असलेली कट्यार कधी पाहिलीये का? खास VIDEO
घर आणि कार्यालयात नेहमी वातानुकूलित वातावरणामध्ये वास्तव्य असल्याने सूर्यप्रकाशाचा थेट शरीराशी संबध येत नाही. आहारात मीठ, कॉफी, शीतपेये यांचा अंतर्भाव हाडांना अत्यंत मारक ठरू शकतो अशी माहिती त्यांनी दिली.





