Kidney Cancer : किडनीच्या कॅन्सरपूर्वी शरीरात दिसतात ही लक्षणं, अजिबात करु नका Ignore, उशीर झाला तर पश्चातापाची येईल वेळ
- Published by:Devika Shinde
Last Updated:
सध्याच्या काळात बदललेली जीवनशैली आणि प्रदूषणामुळे किडनीच्या कॅन्सरचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. किडनी शरीराच्या आतल्या भागात असते, त्यामुळे तिथे गाठ किंवा ट्यूमर झाला तरी तो सुरुवातीला जाणवत नाही. म्हणूनच किडनीच्या कॅन्सरला 'सायलेंट किलर' मानले जाते.
advertisement
सध्याच्या काळात बदललेली जीवनशैली आणि प्रदूषणामुळे किडनीच्या कॅन्सरचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. किडनी शरीराच्या आतल्या भागात असते, त्यामुळे तिथे गाठ किंवा ट्यूमर झाला तरी तो सुरुवातीला जाणवत नाही. म्हणूनच किडनीच्या कॅन्सरला 'सायलेंट किलर' मानले जाते. पण, जर आपण शरीराने दिलेल्या काही छोट्या संकेतांकडे वेळीच लक्ष दिले, तर या आजारातून 90 टक्क्यांहून अधिक रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात. नक्की कोणती आहेत ही लक्षणे? चला, विज्ञानाच्या आधारे जाणून घेऊया.
advertisement
लघवीवाटे येणारे रक्त 'फॉक्स चेस युनिव्हर्सिटी'चे मूत्ररोग तज्ज्ञ डॉ. डेव्हिड चेन यांच्या मते, लघवीचा रंग अचानक बदलणे किंवा लघवीतून रक्त येणे हे किडनी कॅन्सरचे सर्वात मोठे लक्षण आहे. अनेकदा यात वेदना होत नाहीत, त्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण जर विनाकारण लघवी लालसर किंवा गडद रंगाची होत असेल, तर त्वरित तपासणी करणे गरजेचे आहे.
advertisement
कंबर आणि पाठीचा तीव्र त्रासजर तुमच्या पाठीच्या खालच्या भागात किंवा कंबरेच्या एका बाजूला सतत दुखत असेल, तर ती साधी 'बॅक पेन' नसू शकते. ट्यूमरचा आकार वाढल्यामुळे आजूबाजूच्या स्नायूंवर दाब पडतो, ज्यामुळे असह्य वेदना होतात. काही रुग्णांना पोटाच्या बाजूला किंवा हाताला स्पर्श केल्यावर एखादी गाठ जाणवू शकते.
advertisement
अचानक वजन घटणे आणि प्रचंड थकवाकोणताही डाएट किंवा व्यायाम न करता जर तुमचे वजन वेगाने कमी होत असेल, तर सावध व्हा. कॅन्सरच्या पेशी शरीरातील ऊर्जा वेगाने वापरतात, ज्यामुळे भूक मंदावते आणि सतत थकवा जाणवतो. पुरेशी विश्रांती घेऊनही जर तुम्हाला मरगळ वाटत असेल, तर हे किडनी निकामी होण्याचे किंवा कॅन्सरचे लक्षण असू शकते.
advertisement
advertisement
advertisement
घाबरू नका, आधुनिक उपचार उपलब्ध आहेतआज वैद्यकीय क्षेत्रात क्रांती झाली आहे. आता कॅन्सर झाला म्हणजे पूर्ण किडनी काढावी लागतेच असे नाही. रोबोटिक सर्जरीद्वारे केवळ कॅन्सरग्रस्त भाग काढला जातो आणि उरलेली किडनी सुरक्षित राहते. औषधांच्या माध्यमातून शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवून कॅन्सर पेशींचा नाश केला जातो. अत्यंत लहान ट्यूमर गोठवून (Freeze) नष्ट करण्याची क्रायो अ‍ॅब्लेशन ही पद्धत सध्या लोकप्रिय होत आहे.
advertisement
advertisement







