कशी झाली सुरुवात?
वर्धा जिल्ह्यात शासकीय रुग्णालयासह सेवाग्राम आणि सावंगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी इतर जिल्ह्यातूनही रुग्ण येत असतात. या रुग्णांना बऱ्याच वेळा रक्ताची आवश्यकता निर्माण होते. तेव्हा अचानक रक्त मिळणे कठीण होते. अशा परिस्थितीत वर्ध्यातील काही तरुण गरजू रूग्णांना रक्तदान करून जीवनदान देण्याचं काम करत आहेत. त्यासाठी त्यांनी एक ग्रुपच तयार केला आहे. या वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी एकत्र येत या शहीद भगतसिंग ब्लड डोनर ग्रुपची निर्मिती केली.
advertisement
वानरांच्या त्रासामुळे गाव आलं एकत्र, ओसाड परिसराचं बदललं चित्र
500 रक्तदाते झाले पूर्ण
वर्ध्यातील या रक्तदानाच्या चळवळीत अनेक तरण जोडले जात आहेत. अनेक तरुणांनी 3 महिन्यातबन एक वेळा तर काही तरुणींनी वर्षातून 3 वेळा रक्तदान केले. कोरोना संकटापासून आजपर्यंत संघटनेचे 500 रक्तदाते पूर्ण झाले आहेत. त्यामुळे शेकडो रुग्णांना जीवनदान मिळालेय. त्या माध्यमातून रक्तदानाची चळवळ सुरू झाल्याचे ग्रुपचे संस्थापक नीरज बुटे यांनी सांगितले.
रक्तदान करण्यासाठी जनजागृती
आजारपण, शस्त्रक्रिया, अपघात, सिकल सेल अशा आजारांनी ग्रस्त असलेल्यांना रक्ताची प्रचंड आवश्यकता असते. अशा रुग्णांना रक्तपेढ्यांमधून रक्ताचा पुरवठा केला जातो. मात्र काही रुग्णांना रक्तदात्यांच्या शरिरातील ताज्या रक्ताची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत रक्तदात्यांनी तयार केलेल्या साळखीच्या माध्यमातून ते तात्काळ गरजूला रक्त उपलब्ध करुन दिले जात आहे. त्यासाठी गरज पडल्यास ग्रामीण भागातून तातडीने तरुण येतात आणि रक्तदान करतात. आपल्या परिसरातील मित्रमंडळींसह नागरिक, नातेवाईकांना तसेच शालेय जीवनापासून ते महाविद्यालयीन मित्रांना रक्तदानाचे महत्त्व पटवून देत त्यांना रक्तदान करण्यासाठी हे तरुण प्रेरित करीत आहेत.
वजन कमी करण्याचा नवा फंडा, लगेच सुरू करा म्यूझिक योगा
रुग्णालय आणि जिल्हा प्रशासनाने केला गौरव
या तरुणांचे कार्य बघून रुग्णालय आणि जिल्हा प्रशासनातर्फे संघटनेचा गौरवही करण्यात आला. तरुणांची ही सेवा अद्यापही अविरत सुरु आहे. तसेच यापुढेही सुरू असेल. शहीद भगतसिंग ब्लड डोनर ग्रुप, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे सर्व शेकडो रक्तदात्यांचे यासाठी मोलाचे योगदान आहे, असे नीरज बुटे सांगतात.





