पावसाळ्यात मेकअप करताना कोणत्या चुका टाळाव्यात याबाबत माहिती देताना त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे सांगतात की, पावसाळ्यात सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे त्वचेसाठी वापरण्यात येणारे कोणतेही कापड, ब्रश हे ओलसर नसावेत. ते जर ओलसर असेल तर त्या माध्यमातून अनेक त्वचाविकार होतात.
advertisement
बुरशी असलेले मेकअप ब्रश तर वापरत नाहीत ना?
त्याचबरोबर पावसाळ्यात मेकअप करताना तर विशेष काळजी घेणे देखील गरजेचे आहे. मेकअप करताना आता सर्वच महिला ब्रश आणि ब्लेंडर वापरतात. कारण, त्यामुळे मेकअप सेट करण्यास मदत होते. पण, ते वापरल्यानंतर स्वच्छ धुवून आणि वाळवून ठेवले आहेत का? हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. ते जर स्वच्छ धुवून आणि वाळवून ठेवले असतील तर वापरल्यास काही हरकत नाही.
पण, ते तसेच ठेवले असेल आणि त्यावर पांढरा थर आला असेल. तर ते तुमच्या त्वचेसाठी हानिकारक असू शकते. कारण त्याला बुरशी चढलेली असते. त्यामुळे चेहऱ्यावर फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे ही काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकवेळा त्या बुरशीवर महिलांचे लक्ष देखील जात नाही. पण, ते काळजीपूर्वक बघणे महत्त्वाचे आहे.
पावसाळ्यात कुठलीही वस्तू, कापड किंवा आणखी काही त्वचेसाठी वापरण्यापूर्वी ते स्वच्छ धुवून आणि वाळवून घेतल्यावरच वापरावे. त्यामुळे पावसाळ्यात त्वचेला होणारी हानी आपल्याला टाळता येईल, असे त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी सांगितले.