वातावरण बदलामुळे आजारपण का येतं ?
अचानक बदललेल्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी शरीराला वेळ लागतो. त्यातच या काळात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे विषाणूजन्य किंवा जीवाणूजन्य आजारांचं प्रमाण वाढतं. त्यामुळे वातावरण बदलामुळे अनेक जण आजारी पडतात. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते त्यांना फार काही त्रास होत नाही किंवा सर्दी, खोकल्या सारख्या आजारांवर त्यांचं निभावून जातं. मात्र ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्यांना. ताप, अंगदुखी, दमा, श्वसनविकार अशा आजारांचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
जाणून घेऊयात बदलत्या वातावरणात आरोग्याची काळजी कशी घ्यायची ते.
पोषक आहार :
हिवाळ्यात विविध संक्रमणांपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुमच्या शरीराला पोषकतत्त्वांनी परिपूर्ण अशा आहाराची गरज आहे. त्यामुळे हिवाळ्यात जंक फूड टाळून पोषक व्हिटॅमिन, प्रोटिन्स, खनिजं आणि फायबर्सयुक्त आहाराचा समावेश करणं आरोग्याच्या हिताचं ठरतं. याशिवाय संत्री, गाजर, किवी, बीटरूट, आवळा, पेरू आदी व्हिटॅमिन सी युक्त फळं खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.
शरीर हायड्रेट आणि उबदार ठेवा :
सध्या सकाळी गरमी आणि रात्री थंडी अशा एक वेगळ्याच प्रकारच्या वातावरण बदलाला आपल्याला सामोरं जावं लागतंय. त्यामुळे शरीर हायड्रेट आणि उबदार ठेवण्याची गरज आहे. गरजेनुसार उबदार आणि सुती कपड्यांचा वापर करा जेणेकरून शरीराचं रोग्य तापमान राखणं सहज शक्य होईल.
व्यायाम :
वातावरण बदलाचा विपरीत परिणाम तुमच्या शरीरावर होऊन नसेल द्यायचा तर तुम्हाला व्यायाम करण्याची गरज आहे. जास्त थंडीत बाहेर पडणं शक्य नसेल तर घरातल्या घरात चालणं, सूर्यनमस्कार, किंवा योगा सारखे व्यायाम करा ज्यामुळे शरीर आतून उबदार राहायला मदत होईल.
चांगली झोप :
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल मात्र हे खरं आहे, तुमच्या निरोगी आयुष्यात व्यायाम, आहार याला जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व हे शांत आणि गुणवत्तापूर्ण झोपेला आहे. शांत झोपेमुळे तुम्ही अनेक आजारांना दूर ठेऊ शकता.