सहसा या खुणा काही दिवसांत नाहीशा होतात. पण काही वेळा, ही खूण एका आठवड्यानंतरही जात नाही आणि कधीकधी वेदना आणि सूज देखील वाढते.
Skin Care : चेहऱ्यावर मध लावावा का ? मध चेहऱ्यासाठी फायदेशीर आहे का ? वाचा त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला
आहारतज्ज्ञांच्या मते, दुखापत झाल्यानंतर लगेचच जखम झालेल्या भागावर बर्फाचा पॅक म्हणजेच आईस पॅक लावं खूप फायदेशीर आहे. बर्फाचे पॅक लावल्यानं रक्त गोठण्याची प्रक्रिया मंदावते आणि सूज कमी होते.
advertisement
पहिले 48 तास, त्या भागावर दहा ते पंधरा मिनिटं दिवसातून तीन ते चार वेळा कोल्ड कॉम्प्रेस म्हणजेच आईस पॅक लावा. पण बर्फ थेट त्वचेवर लागणार नाही याची काळजी घ्या. आईस पॅक प्रथम स्वच्छ कापडात गुंडाळा आणि नंतर ते त्वचेवर लावा.
Health Tips : तिशीच्या टप्प्यावर आरोग्याकडे द्या विशेष लक्ष, योगासनांनी राहिल तब्येत तंदुरुस्त
जखम झाल्यानंतर दोन दिवसांच्या अंतरानं कोमट स्पंज किंवा हॉट वॉटर बॅगमधे खूप गरम नाही पण कोमट पाणी टाकून वापरा. यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते आणि रक्ताची गुठळी हळूहळू विरघळू लागते. यामुळे जखम लवकर हलकी होते आणि वेदना देखील कमी होतात.
मालिश टाळा - तज्ज्ञांच्या मते, दुखापत झालेल्या भागावर थेट दाब देऊन किंवा दाबून मालिश करणं योग्य नाही. यामुळे दुखापत आणखी वाढू शकते किंवा सूज येऊ शकते. त्यामुळे त्या भागाचं मालिश करणं टाळा, फक्त हलक्या हातांनी गरम तेल लावत राहा. यामुळे दोन दिवसांत त्वचेवरील डाग पूर्णपणे निघून जाईल आणि तुम्हाला कोणताही त्रासही जाणवणार नाही.