वजन कमी करण्यासाठी काहीजण गोळ्या आणि इंजेक्शन्सही घेतात. योगगुरु बाबा रामदेव यांनी या विषयावर खूप मोलाचा सल्ला दिलाय. लोकांना या कृत्रिम औषधांच्या धोक्यांबद्दल त्यांनी इशाराही दिला.
Cracked heels : हिवाळ्यात टाचा मऊ कशा ठेवायच्या ? हे उपाय ठरतील परिणामकारक
वेगोवी, ओझेम्पिक आणि मौंजारोसारख्या अनेक इंजेक्शन आणि गोळ्या आजकाल बाजारात लोकप्रिय होत आहेत. भूक कमी करून वजन कमी करण्याचा दावा या कंपन्यांचा करतात पण हे उपाय शरीरासाठी अत्यंत धोकादायक असल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे.
advertisement
कृत्रिम पद्धतीनं वजन कमी केल्यानं आरोग्याला गंभीर नुकसान होऊ शकतं. बाबा रामदेव यांच्या मते, वजन कमी करण्यासाठी कोणत्याही बाह्य औषधांची आवश्यकता नाही. त्यांनी काही सोप्या आणि प्रभावी टिप्स सांगितल्यात.
बाबा रामदेव यांनी दिलेल्या टिप्स -
दुधीचा रस आणि कोमट पाणी: सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिणं आणि दुधीचा रस पिणं चरबी जाळण्यास खूप उपयुक्त आहे.
नियमित योगासनं आणि सकाळी धावणं शरीराला नैसर्गिकरित्या तंदुरुस्त ठेवतं.
पोटाला थोडी विश्रांती देण्यासाठी दिवसातून फक्त एकदाच जेवण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.
Yogasana : हिवाळ्यात करा ही योगासनं, लवचिकता वाढवा, फिट राहा
योगगुरुंच्या मते, आठ ते दहा तास फोन आणि इंटरनेटपासून दूर राहिल्यानं म्हणजेच डिजिटल फास्टिंग केल्यानं मनाला शांती मिळू शकते.
निरोगी राहण्यासाठी कोणतेही शॉर्टकट नाहीत. औषधे आणि इंजेक्शन्सचा अवलंब करण्याऐवजी, योग, संतुलित आहार आणि उपवास म्हणजेच इंटरमिटंट फास्टिंग हेच दीर्घायुष्याचं आणि तंदुरुस्त शरीराचं खरं रहस्य असल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलंय.
