मासिक पाळीतील काही नियम ज्यांना काहीच लॉजिक नाही. त्यामुळे आताच्या महिला त्या नाकारतात. पण काही नियम असे आहेत, जे नाकारून चालणार नाही. कारण ते फक्त समज किंवा अंधश्रद्धा नाही तर ज्यामागे वैज्ञानिक कारणं आहेत. डोक्यावरून अंघोळ करणं हा त्यापैकी एक नियम ज्यामागे वैज्ञानिक कारण आहे.
काय! दुधामुळे कॅन्सर होतो? डॉक्टरांनीच सांगितला कसा होतो परिणाम
advertisement
तसं आपली आजी किंवा आई आपल्याला सामान्यपणे मासिक पाळीत डोक्यावरून अंघोळ म्हणजे मासिक पाळीमुळे अशुद्ध झालेलं शरीर शुद्ध करणं असं सांगतात. पण डॉक्टरांनी यामागील खरं कारण सांगितलं आहे.
एकतर पाळी यायला हवी म्हणून आपण डोक्यावरून अंघोळ करतो किंवा पाळी आल्यावर तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या दिवशी अंघोळ करतो.
पाळीच्या काळात शरीरातील उष्णता वाढलेली असते त्यामुळे फ्लो खालच्या दिशेने जातो. जेव्हा आपण डोक्यावरून अंघोळ करतो तेव्हा शरीराचं तापमान बदलतं. पाळीच्या काळात उष्णता वाढल्याने फ्लो खालच्या दिशेने असतो. या काळात डोक्यावरून अंघोळ केली शरीराचं तापमान बदलतं आणि रक्तप्रवाह डोक्याकडे जातो. ज्यामुळे फ्लो किंवा स्राव थांबतो.
Expert Tips : दह्यातलं हे पिवळं पाणी चांगलं की खराब, ते तसंच ठेवायचं की फेकून द्यायचं?
त्यामुळे पाळी यायच्या आधी किंवा पाळी वेळेवर थांबावी म्हणून चौथ्या दिवशी डोक्यावरून अंघोळ करा. पाळीच्या दिवसात डोक्यावरून अंघोळ केली तर अपचन होतं किंवा थकवाही जाणवतं. त्यामुळे मासिक पाळीबाबतचा हा नियम आपण फॉलो करणं खूप गरजेचं आहे, असं आयुर्वेदिक डॉक्टर मानसी धामणकर यांनी सांगितलं. त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर ही माहिती देणारा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.