TRENDING:

Ahmednagar Crime News : अधुरी एक कहाणी! लग्नाच्या तीन महिन्यानंतर नवदाम्पत्यानं संपवलं आयुष्य; अहमदनगर हादरलं

Last Updated:

Ahmednagar Crime News : पती-पत्नी दोघांचे मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत ग्रामस्थांना दिसले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हरिश दिमोटे, प्रतिनिधी अहमदनगर : हातावरची मेहंदी उतरली आणि सुखी संसाराची स्वप्न रंगवण्याच्या काळात नवदाम्पत्याने घेतलेल्या निर्णयानं संपूर्ण गावं हादरलं आहे. सुखी-गुण्यागोविंदाने नांदण्याची स्वप्न स्वप्नच राहिली. नवविवाहित दाम्पत्याने अचानक टोकाचा निर्णय घेतला आणि गावात एकाच खळबळ उडाली.
News18
News18
advertisement

नवदाम्पत्याने झाडाला गळफास घेऊन आयुष्य संपवलं आहे. पती-पत्नी दोघांचे मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत ग्रामस्थांना दिसले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील साकुर इथे धक्कादायक घटना घडली आहे.

वैभव आमले आणि स्नेहा आमले असं दोघांची नावं असल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांना बोलवलं. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून पुढे तपास सुरू केला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या दोघांचा तीन महिन्याआधीच विवाह झाला होता. पुण्यात नोकरी करत होते. दोन दिवसांपूर्वी दोघेही आपल्या गावी साकूरला आले होते.

advertisement

संगमनेर तालुक्यातील साकुर येथील वैभव दत्तात्रेय आमले वय वर्ष 22 व स्नेहा वैभव आमले वय वर्ष 20 या नवविवाहीत दापत्यांनी रवीवारी सायंकाळी साकुर येथील मुळा नदीच्या जवळील मांगमळीत गळफास घेत आत्महत्या केली.

घटनेची माहिती समजतात स्थानिक रहिवासी आणि साकुर गावचे ग्रामस्थ घटनास्थळी धाव घेत सदर घटनेची माहिती घारगाव पोलिसांना दिली. घारगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सदर घटनेचा पंचनामा केला असून सदर घटना कशामुळे घडली हे मात्र समजू शकले नाही.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात घट, सोयाबीन आणि कापसाला आज काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

पुण्यातून गावी आल्यानंतर दोघांनी आयुष्य संपवलं आहे. त्यांनी टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप कारण समजू शकलं नाही. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. कोणत्याही गोष्टीला आयुष्य संपवणं हा पर्याय नसतो. नवंदाम्पत्याने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं याची चर्चा गावात सुरू झाली आहे. पोलीसही नातेवाई, मित्रांची चौकशी करत आहेत.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ahmednagar Crime News : अधुरी एक कहाणी! लग्नाच्या तीन महिन्यानंतर नवदाम्पत्यानं संपवलं आयुष्य; अहमदनगर हादरलं
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल