आज सकाळी ग्रामदैवत म्हसोबाचे दर्शन घेऊन राजेंद्र विखे यांनी आपला अर्ज दाखल केला असून राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतरच मी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतल्याचं राजेंद्र विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
काही दिवसापूर्वीच भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केला असून मतदारसंघात भेटीगाठी देखील सुरू केल्या आहेत. एकिकडे हा मतदारसंघ शिंदे गटाकडे असताना भाजपच्या विखे आणि कोल्हेंनी बंडखोरी करत आपला अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे भाजप पक्षश्रेष्ठींची यास संमती आहे का? असाही प्रश्न उपस्थित होतोय.
advertisement
वाचा - 'इंडिया आघाडीचं सरकार येणार', पुढचा पंतप्रधान कोण होणार? संजय राऊतांनी क्लिअर केलं
विखे आणि कोल्हे कुटूंबीय अनेक वर्षांपासून पारंपरिक राजकीय विरोधक राहीले आहेत. काही महिन्यांपूर्वीच विखेंची सत्ता असलेल्या गणेशनगर साखर कारखान्यावर आणि काही ग्रामपंचायतीवर देखील कोल्हेंनी सत्ता मिळवत विखेंना शह दिला आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात जर विखे आणि कोल्हे यांची लढत झाली तर ही लढाई रंगतदार होणार आहे. मात्र, अर्ज माघारीच्या दिवशी खरं चित्र स्पष्ट होणार आहे.
