अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. सुरुवातीला तांत्रिक बिघाड किंवा हवामानातील बदल हे अपघाताचे कारण सांगितले जात होते. मात्र, ज्या पद्धतीने हे विमान कोसळले आणि त्यापूर्वीच्या काही घडामोडी पाहता, हा पूर्वनियोजित कट तर नव्हता ना? अशी शंका पवार कुटुंबीयांच्या मनात निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पार्थ पवार आणि कुटुंबातील इतर सदस्य दिल्लीत जाऊन पंतप्रधानांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते या संपूर्ण प्रकरणाची सर्वोच्च स्तरावरून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करणार आहेत.
advertisement
'व्हीएसआर' एअरवेजची सर्व विमाने तातडीने जमिनीवर आणा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या 'व्हीएसआर' (VSR) कंपनीच्या विमानातून अजित पवार प्रवास करत होते, त्या कंपनीच्या सुरक्षेबाबत आणि तांत्रिक देखभालीबाबत पवार कुटुंबीयांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. जोपर्यंत या अपघाताचा सखोल तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत 'व्हीएसआर' एअरवेजची सर्व विमाने तातडीने जमिनीवर आणावीत आणि त्यांची उड्डाण थांबवावी, अशी इच्छा कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. इतर कोणत्याही प्रवाशाचा जीव धोक्यात येऊ नये, हा त्यामागील हेतू असल्याचे बोलले जाते.
अपघात की घातपात
रोहित पवार यांनी यापूर्वीच हा अपघात घातपात असू शकतो, असे सूचक विधान केले होते. आता अजित पवारांचे कुटुंबीय स्वतः मैदानात उतरल्याने या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. जर खरोखरच यात घातपाताचा आढळून आला तर भारतीय राजकारणात मोठे भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या संपूर्ण महाराष्ट्र आपल्या लाडक्या नेत्याच्या जाण्याने शोकाकुल असून, सत्याचा उलगडा व्हावा हीच प्रत्येक कार्यकर्त्याची भावना आहे.
हे ही वाचा :
