advertisement
रोहित पवार यांचे गंभीर आरोप
बीड लोकसभा मतदारसंघा भाजपकडून विशेषतः परळी तालुक्यात अधिकाऱ्यांना धमकावून बोगस मतदान व मतदान केंद्र ताब्यात घेण्याचे गैरप्रकार करण्यात आले. सत्ताधाऱ्यांची ही दडपशाही रोखण्याची हिंमत बबन गीते यासारख्या अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवली. निवडणूक आयोग या प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करणारे आहे की फक्त विरोधकांवर आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यातच धन्यता मानणार आहे? असो पण एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणाला आदर्श घालून देणाऱ्या बीड जिल्ह्यात दडपशाहीचे हे प्रकार सत्ताधाऱ्यांना शोभत नाहीत, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.
वाचा - 4 जूननंतर दोन्ही ठाकरे बंधू..., प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा
पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया
आमदार रोहित पवार यांच्या आरोपानंतर भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा म्हणाल्या, त्यांच्यावर मी काही उत्तर देणं प्रशस्त वाटत नाही. ज्याची कोणाची तक्रार आहे, त्यांनी निवडणूक आयोगाकडे करावी. असं घडलं असतं तर मी इथे उभी नसते. सलग पाचवी निवडणूक आम्ही हाताळतो आहोत. आम्ही विरोधी पक्षात असताना त्यांनी 15 आमदार लावले होते. त्यांचा आत्मविश्वास कमी झाल्याचं हे लक्षण आहे. आमच्या भाषेत याला चिडी जाण्याचं लक्षण म्हणतात. निवडणूक झाल्यावर त्यांच्या अशा बोलण्यावरुन त्यांचा आत्मविश्वास कमी झाल्याचं दिसत असल्याची टीका पंकजा मुंडे यांनी केली.
