काय म्हणाले रविकांत तुपकर?
पक्ष विरोधी कारवाया, पक्ष श्रेष्ठी विरोधात आरोप करणाऱ्या रविकांत तुपकरांची पक्ष संघटनेकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनी रविकांतकरांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून हकालपट्टी केली आहे. त्यानंतर रविकांत तुपकर माध्यमांसमोर आले आहे आणि आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संघटनेसाठी 20-22 वर्षे काम केल्यानंतर त्याचं फळ असं मिळेल अशी अपेक्षा नव्हती असं म्हणत, कोल्हापूरमध्ये सीमित असणारी संघटना राज्यभर वाढवण्यासाठी काम केलं असल्याचं रविकांत तुपकर यांनी म्हटलंय. त्यामुळे आता 24 तारखेनंतर आपली पुढची भूमिका स्पष्ट करणार असल्याच रविकांत तुपकर यांनी सांगितलंय. त्यामुळे आता 24 तारखेच्या बैठकीनंतर रविकांत तुपकर हे नवीन संघटना काढतात किंवा कुठल्या पक्षात जातात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
advertisement
तुपकरांनी बोलावली होती संघटनेची बैठक
रविकांत तुपकर यांनी बोलावलेल्या बैठकीशी संघटनेचा कोणताही संबंध नाही असंही स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून स्पष्ट करण्यात आलंय. जालिंदर पाटील म्हमाले की, तुपकर यांना अनेकदा संधी देऊनही ते आमच्या शिस्तपालन समितीसमोर हजर झालेले नाही. उलट ते शेट्टी यांच्यावर सातत्याने टीका करताना दिसतात. गेल्या तीन ऊस परिषदेलाही ते गैरहजर राहिले आहेत.
वाचा - 'रिक्षा गुलाबी, जॅकेट गुलाबी पण...' जयंत पाटलांची अजितदादांना कोपरखळी, म्हणाले..
बुलढाणा लोकसभासुद्धा तुपकर यांनी संघटनेच्या एबी फॉर्म वर लढण्याऐवजी अपक्ष लढवली. याचा अर्थ त्यांना स्वाभिमानी संघटनेत कोणताही रस दिसत नाही. अलिकडे तर तुपकर हे स्वाभिमानी ही संघटना माझ्याच नावावर असल्याचा ते दावा करू लागलेत. या संभ्रमावर आम्हाला उत्तर हवंय कारण तुम्ही दिलेल्या राजिनाम्याचं पञ आमच्याकडे आहे मग तरीही संघटनेवर तुम्ही दावा कसा काय करता? असा प्रश्न जालिंदर पाटील यांनी विचारला.
