वर्ध्यात कार आणि दुचाकीचा अपघात झाला. या भीषण अपघातात दाम्पत्यांनी आपला जीव गमावला. केळझर येथील दाम्पत्य गावी परत जात असताना कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत पतीचा जागीच मृत्यू झाला तर पत्नीचा रूग्णालयात मृत्यू झाला.
मराठा आरक्षणासाठी राजीनामा दिलेल्या खासदार हेमंत पाटील यांना राष्ट्रपतींनी पाठवले समन्स
काल 29 नोव्हेंरला दुपारी दीडच्या सुमारास वर्ध्यामध्ये ही घटना घडली. चुकीच्या दिशेने दुचाकी चालवत दुभाजक ओलांडण्याच्या प्रयत्न करत असताना भरधाव कारनं दुचाकीला धडक दिली. या धडकेत अवधूत वैरागडे (वय 60वर्ष) व चित्रा वैरागडे (वय 55 वर्ष) दोघांची जीव गेला. ही धडक इतकी भीषण होती, की दुचाकीवरील पती-पत्नी रस्त्यावर फेकले गेले. या घटनेत त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. अवधूत यांचा जागीच जीव गेला आणि चित्रा यांनी रुग्णालयात नेण्यानंतर. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडालीय.
advertisement
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या भीषण अपघातात दाम्पत्यांत्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
