महापालिका निवडणुका अगदी तीन महिन्यांवर येऊन ठेपल्याने सगळ्याच राजकीय पक्षांनी आपापल्या पद्धतीने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. दुसरीकडे युती आघाड्यांच्या चर्चांनाही वरिष्ठ स्तरावर वेग आलेला आहे.
...तर काँग्रेस आघाडीतून बाहेर पडेल
कोणीही एकत्र आले तरी त्याचा फरक महायुतीला पडणार नाही. महायुती खूपच शक्तिशाली आहे. तिन्ही पक्षांत उत्तम समन्वय आहे. ज्यावेळी युती होते तेव्हा आपल्याला संधी मिळेल की नाही या चिंतेने त्या त्या पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी गोंधळून जातात. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे वोट बँक तुटण्याच्या भीतीने काँग्रेस बाहेर पडेल, असा मोठा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.
advertisement
अटल सेतू, कोस्टल रोड, मुंबईत सर्वसामान्यांना आम्ही घरे दिली, त्यामुळे मुंबईकर आमच्यावर खूश
चंद्रकांत पाटील म्हणाले, "आमची माहिती एवढी निश्चित आहे की कोणीही एकत्र आले तरी त्याचा फरक महायुतीला पडणार नाही. ज्यावेळी युती होते तेव्हा त्या त्या पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी गोंधळून जातात. ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्यामुळे काँग्रेस बाहेर पडेल, त्यामुळे आम्ही केलेल्या विकास कामामुळे मुंबईतील जनता पॉझिटिव्ह आहे. मुंबईत महायुतीने खूप कामे केली आहेत. अटल सेतू रोड, कोस्टल रोड करण्याबरोबर मुंबईत सर्वसामान्यांना आम्ही घरे दिली. त्यामुळे मुंबईकर आमच्यावर खूश आहे, नागरिकांचा आम्हाला मोठा पाठिंबा मिळेल"