मिळालेल्या माहितीनुसार 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. सेसमिक स्टडी ऑफ इंडियाच्या भूकंप ॲपवर या भूकंपाची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाने कोणतीही हानी झालेली नाही. विशेष म्हणजे, या परिसरातील नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले नसल्याचेही माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असं आवाहन केलं आहे.
advertisement
चंद्रपूरमध्ये आजपासून पुन्हा मुसळधार पाऊस चंद्रपुरात पडणार आहे अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. पुढचे ५ दिवस महत्त्वाचे असून राज्यात अति मुसळधार पाऊस राहील. राज्यात मान्सूनच्या परतीचा प्रवास थांबला असून, २३ ते २९ सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर वाढणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार होणारी नवीन कमी दाबाची प्रणाली ‘डिप्रेशन’मध्ये रूपांतरित होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही सायक्लोनिक सर्क्युलेशनचा धोका वाढला असून अति मुसळधार पाऊस होत आहे. त्याच वेळी भूकंपाचे धक्के बसल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.