नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
राजकीय पक्षाचं काम असतं की, लोकांकडे लक्ष दिलं पाहिजे. पण काँग्रेस पहिल्यापासून अडचणीत होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विभाजन कुणी केलं. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर काश्मिरमध्ये अडचणी काँग्रेसने उभ्या केल्या. आपल्या आजूबाजूला अनेक देश प्रगती करत आहे. पण देश कुणामुळे अडचणीत आहे. देश कित्येक वर्ष दहशतवादाने ग्रासलेला होता. दहशतवाद्यांना कोण संरक्षण कोण देत होतं. काँग्रेस देत होती. माओवाद्याची लाल दहशत कुणामुळे वाढली ती काँग्रेसमुळेच वाढली.
advertisement
राम मंदिरांचा प्रश्न काँग्रेसमुळेच प्रलंबित
राम मंदिर निर्माणाचा विषय अनेक वर्षांपासून रखडलेला होता. राम मंदिराच्या कामात कोण अडथळा आणत होतं. राम मंदिराच्या कामाला विरोध करण्यासाठी कोर्टात जात होते. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर कुणी विरोध केला, बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न कुणी दिला नाही., या सगळ्या अडचणीचं एकच उत्तर आहे काँग्रेस. दोन टर्मपासून काँग्रेस सत्तेतून बाहेर आहे. या 10 वर्षांमध्ये भाजपने चांगलं काम केलं. माओवाद कमी झाला आहे. आमचा गडचिरोली आता स्टील स्टेट होणार आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे, कडू कारले, भरले, साखरेमध्ये घोळले तरी ते कडू ते कडू आहे. कारल्याला तुपामध्ये तळा किंवा साखरेच्या पाकेमध्ये बुडवले तरी कडूच्या कडू राहते, असा वाक्प्रचार मोदी यांना वापरला.
वाचा - 'महाविकासआघाडी सरकार कमिशनखोर', महाराष्ट्रातल्या पहिल्याच सभेत पंतप्रधान मोदींचा हल्ला
मोदी कधी शाही कुटुंबात जन्माला आले नाही. गरिब कुटुंबातच माझा जन्म झाला आहे. दलित, वंचित हे तिच लोक आहे, त्यांच्या घरात विज नव्हती, पाणी नव्हतं, त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. त्यानंतर मोदींनी गॅरंटी दिली आहे की, वंचित वर्गासाठी काम करण्याचं ठरवलं आहे. केंद्र सरकारच्या पीएम आवास योजनेचा सगळ्यात जास्त फायदा हा दलित आणि आदिवासी समाजाला झाला आहे, असंही मोदींनी सांगितलं.