TRENDING:

Ambadas Danve : 'कुटनीतीच्या काळात..' अंबादास दानवे यांच्या मनातील खदखद बाहेर, स्टेटस ठेवत म्हणाले..

Last Updated:

Ambadas Danve : शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे, मात्र, या यादीवर ठाकरे गटातील नेताच नाराज असल्याचे समोर आले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
ambaछत्रपती संभाजीनगर, (सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी) : शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, या यादीवरून आता महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या यादीवर नाराजी व्यक्त केली आहे. इतकेच नाही तर आता ठाकरे गटातील एका मोठ्या नेत्याच्या मनातील खदखदही या निमित्ताने बाहेर आली आहे.
News18
News18
advertisement

अंबादास दानवे यांची खदखद...

संभाजीनगर लोकसभा उबाठा गटाची उमेदवारी चंद्रकांत खैरे यांना जाहीर झाली. यावर सकाळी उबाठाचे दुसरे दावेदार अंबादास दानवे यांनी आपण नाराज नसल्याचे मीडियाला सांगितले. मात्र, त्यानंतर त्यांनी व्हॉटसअपवर एक शायरी स्टेटसला ठेवली. या स्टेटस चा अर्थ समजून घेणे तसे अवघड आहे. मराठीत त्याचा अर्थ आपण काढू शकतो. "सध्या कुटनीतीचा काळ आहे. आणि आम्ही प्रयत्नामध्ये गुरफटून गेलो आहोत"

advertisement

यामधून अंबादास दानवे यांच्या मनातील खदखद दिसत आहे. उमेदवारीसाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करीत होतो. आणि आताचा काळ कुटनीतीचा आहे. अंबादास दानवे यांच्या प्रामाणिक प्रयत्नांचा पराभव झाला आणि कुटणीतीचा विजय झाला, असे त्यांना म्हणायाचे असू शकते. म्हणजे उबाठामध्ये चंद्रकांत खैरे यांच्या उमेदवारीमुळे अंबादास दानवे नाराज दिसत आहेत. आणि ही नाराजी उबाठा गटाला परवडणारी नाही. कदाचित अंबादास दानवे वेगळा पर्याय निवडू शकतात.

advertisement

वाचा - शिवसेनेच्या गोटात धाकधूक वाढली, एका सर्व्हेमुळे उमेदवारांनी भरली धडकी, या खासदारांचा रिपोर्ट निगेटिव्ह!

मित्रपक्षही ठाकरे गटावर नाराज

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

उद्धवजींनी आज शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. ज्यामध्ये सांगली आणि मुंबईतील ज्या जागांवर चर्चा सुरू होती, तेथीलही उमेदवार जाहीर केले. जेव्हा आम्ही त्या प्रलंबित जागांच्या संदर्भाने चर्चेमध्ये आहोत, काँग्रेसची त्या जागांबाबत आग्रही मागणी आहे, अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही, असे असतानाही त्या जागांवरून उमेदवार जाहीर करणे हे योग्य नाही. आघाडी धर्माचे पालन सगळ्यांनीच केले पाहिजे, असे माझे मत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, शिवसेनेने या जागांवर फेरविचार करावा, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Ambadas Danve : 'कुटनीतीच्या काळात..' अंबादास दानवे यांच्या मनातील खदखद बाहेर, स्टेटस ठेवत म्हणाले..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल