राजधानी मुंबईला जाण्यासाठी चिकलठाणा विमानतळावरून सायंकाळी विमान सुरू करण्याची मागणी गेल्या काही काळापासून होत आहे. ही मागणी पूर्ण करत काहीच दिवसांपूर्वी 'इंडिगो'ने आगामी सहा महिन्यांसाठी मुंबईला छत्रपती संभाजीनगर ते मुंबई विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. याबाबत वेळापत्रकही जाहीर केले होते. परंतु, आता नव्याने वेळापत्रक जाहीर केले असून यातून ही विमानसेवा रद्द करण्यात आली आहे.
advertisement
चूक झाली, क्षमा मागतो; जिचा विषय संपला म्हणाले तिच्याशीच हर्षवर्धन जाधवांनी केलं लग्न
दरम्यान, चिकलठाणा विमानतळावरून 'इंडिगो'च्या मुंबई, दिल्ली, हैदराबाबद आणि बेंगळुरू या शहरांसाठी विमानसेवा सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर येथून राजधानी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढलेली आहे. येथून संपूर्ण मराठवाड्यातून प्रवासी मुंबईला जात असतात. हा ओघ पाहूनच 'इंडिगो'ने 'विंटर शेड्युल'ची घोषणा केली होती. परंतु, सेवा सुरू होण्यापूर्वीच हा निर्णय बदलण्यात आला आहे.