सध्या उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यातच अजिंठा परिसरात लेणी पाहण्यासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शुक्रवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास काही पर्यटक लेणी क्रमांक 4 पाहात होते. तेव्हा वाढत्या उन्हामुळे येथील मोहोळ उठले आणि माशांनी पर्यटकांचा पाठलाग सुरू केला. मधमाश्यांच्या हल्ल्यात काही पर्यटक जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
advertisement
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी मनोज पवार यांनी तत्काळ सुरक्षारक्षकांना सूचना दिल्या. तसेच पर्यटकांची आवक काही काळ थांबवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
उन्हाळ्यात मधमाश्यांच्या हल्ल्याचा धोका
उन्हाळ्यात उष्णतेचा पारा वाढला की मधमाश्या उठण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे मधमाश्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढतात. अशा वेळी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी काही काळ त्या भागात जाण्यास मनाई केली जाते. तसेच मधमाश्या शांत झाल्यानंतर पर्यटकांना पुन्हा लेणी पाहण्यासाठी सोडण्यात येते, असे पुरातत्त्व विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
