मनमाड स्थानकातील नूतनीकरणामुळे 5 ते 7 सप्टेंबर दरम्यान छ. संभाजीनगरहून जाणाऱ्या रेल्वे सेवेचा मोठा फटका बसणार आहे. नांदेड, हिंगोली, सिकंदराबादहून येणाऱ्या व जाणाऱ्या पाच गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. तीन गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या असून दोन गाड्या उशिराने सोडण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे 20 हजार प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
advertisement
हैदराबाद विभागात झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे नांदेड विभागातील नऊ गाड्यांसाठी रेक उपलब्ध नाहीत. त्यामुळे 2 ते 4 सप्टेंबरदरम्यान या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. नांदेड विभागातून मनमाडमार्गे जाणाऱ्या गाड्या मनमाड स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामामुळे इतर मार्गांनी वळवण्यात आल्या आहेत. पुणे, मुंबई आणि नवी दिल्लीकडे जाणाऱ्या दहा गाड्यांचा यात समावेश आहे.
रेकअभावी रेल्वे गाड्या रद्द
2 सप्टेंबर : परळी आदिलाबाद, आदिलाबाद-पूर्णा, पूर्णा-जालना, आदिलाबाद-नांदेड, नांदेड- आदिलाबाद
3 सप्टेंबर 25: जालना-नगरसोल, नगरसोल-जालना, नगरसोल नांदेड
4 सप्टेंबर : नांदेड-मेदचल...
5 सप्टेंबर : रेल्वे : रामेश्वरम-ओखा
बदलण्यात आलेला मार्ग : पूर्णा, हिंगोली, अकोला, भुसावळ, जळगाव, पाळधी
6 सप्टेंबर : रेल्वे : निजामाबाद-पुणे
बदलण्यात आलेला मार्ग : पूर्णा, परभणी, लातूर रोड,
कुडूवाडी, दौंड 7 सप्टेंबर : रेल्वे : नांदेड -अमृतसर सचखंड एक्स्प्रेस
बदलण्यात आलेला मार्ग : पूर्णा, हिंगोली, अकोला,भुसावळ, खंडवा
7 सप्टेंबर : रेल्वे : मुंबई- नांदेड तपोवन एक्स्प्रेस
बदलेला मार्ग : कल्याण, कर्जत लोणावळा, पुणे, दौंड, कुडूवाडी, लातूर रोड, परळी, परभणी या मार्गाने या रेल्वे गाड्या जातील.
रेल्वे : नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेस
बदलण्यात आलेला मार्ग : पूर्णा, परभणी, लातूर रोड, कुडूवाडी, दौंड, पुणे, कल्याण असा हा मार्ग असेल.
अंशत : रद्द केलेल्या रेल्वे
6 सप्टेंबर : काचिगुडा - मनमाड एक्सप्रेस
कुठपर्यंत धावणार : काचिगुडा ते नगरसोल
7 सप्टेंबर : हिंगोली- मुंबई जनशताब्दी
कुठपर्यंत धावणार : हिंगोली ते नगरसोल.
धर्माबाद-मनमाड : कुठपर्यंत धावणार : धर्माबाद ते छत्रपती संभाजीनगर आहे.
7 सप्टेंबर: मुंबई- हिंगोली जनशताब्दी मुंबई ते नगरसोलदरम्यान रद्द, नगरसोल ते हिंगोली धावेल मनमाड धर्माबाद मनमाड ते संभाजीनगर दरम्यान रद्द, संभाजीनगर ते पुढे धावणार मनमाड ते काचिगुडा मनमाड ते नगरसोलदरम्यान रद्द. नगरसोलपासून पुढे धावेल.
उशिरा सुटणाऱ्या गाड्या
7 सप्टेंबर रोजी साईनगर शिर्डी काकीनाडा पोर्ट रेल्वेचे नियोजित वेळेत सायंकाळी 5 वाजेची श्री साईनगर शिर्डी येथून सुटण्याची आहे. ही गाडी रात्री 8 वाजता सुटेल. नांदेड फिरोजपूर कँट गाडीची नांदेड येथून सुटण्याची नियोजित वेळ दुपारी 11.50 वाजेची आहे. ही गाडी दुपारी 12.20 वा. सुटेल.






