नेमकं काय म्हणाले दानवे?
'आमचं वैयक्तिक दुःख काही नाही, मात्र राज्याची जनता दुःखी असल्याने आम्ही दुःखी आहोत. सत्ता बदल होणार यात काही शंका नाही गणपती त्यावर शिक्कामोर्तब करतील. आधुनिक अभिमन्यू म्हणून फडणवीस कुठेच बसत नाहीत, फडणवीस चक्रव्यूहमध्ये अडकले नाहीत तर ते स्वतः त्यात गेले आहेत. अभिमन्यू धर्माच्या बाजूने होते, आधुनिक अभिमन्यू अधर्मी आहेत, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी फडणवीसांवर केला आहे.
advertisement
'दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी महायुती सरकारवर देखील निशाणा साधला. मराठा आरक्षणबाबत जे सत्तेत आहेत त्यांनीच ओबीसी आरक्षणाबाबत लिहून द्यावे. आम्ही त्यांच्यासोबत असणार आहोत.आता ते सत्तेत आहेत, म्हणून त्यांनी आधी जरांगे यांना लिहून द्यावे. मुख्यमंत्री यांनी जाहीर करावे किती लोकांना रोजगार मिळाला, एखादे ऍग्रिमेंट झाले म्हणजे उद्योग मिळाले असं होत नाही. सरकार फक्त घोषणा गोलमोल करण्यासाठी करते' असं दानवे यांनी म्हटलं आहे.