नेमकं काय म्हणाले दानवे?
'सर्व्हे खरे असतात असा काही भाग नाही, जनतेचा पोल घेतला तर सर्व्हे खोटे पडतील. पंतप्रधान प्रचारात घसरले.हे सर्व्हे फोल ठरतील. इंडिया आघाडीला देशआत 295 च्या आसपास जागा मिळतील. महाराष्ट्रात मोठे यश मिळणार आहे. महाविकास आघाडीला राज्यात 31 पेक्षा जास्त जागा मिळतील. जनमत उद्धव ठाकरे यांच्या मागे आहे .पवार साहेबांना पण यश मिळणार आहे. सर्व्हेवर आमचा विश्वास नाही. कर्नाटकात काँग्रेसच्या बाजूनं जनमत आहे.' असं दानवे यांनी म्हटलं आहे.
advertisement
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी ईव्हीएमवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. 'ईव्हीएमवर सर्वांनाच साशंकता आहे. मतमोजणी करताना फॉर्म ठेवण्याचे ठरले आहे. सगळ्या व्होटिंग मशीनवर लक्ष ठेवायला हवं. मी राज्यातील महाविकास आघाडीच्या पोलिंग एजेंटला सांगणार आहे. कोणाला किती मतं मिळतात याशी आम्हाला देणं घेणं नाही, मात्र आम्हाला यश मिळणार आहे.' असं दानवे यांनी म्हटलं आहे.