नारळाच्या दरात तेजी का?
श्रावण महिन्यापासून सण, समारंभ आणि लग्नसराईमुळे नारळाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या काही वर्षांपासून नारळाची मागणी सातत्याने वाढत आहे. यंदा ती गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट झाली आहे, असे नारळाचे घाऊक व्यापारी सांगतात. नारळाचे प्रमुख उत्पादन कर्नाटकातील कित्तूर आणि तामिळनाडूतील कांगायम येथे होते. मात्र, बदलत्या हवामानामुळे आणि सततच्या पावसामुळे नारळाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे मागणीनुसार पुरवठा करणे शक्य होत नाही. याचा थेट परिणाम दरावर झाला आहे.
advertisement
उत्सव आणि दर वाढ
गणेशोत्सवासाठी महाराष्ट्रात, रक्षाबंधनासाठी गुजरातमध्ये, तर दसरा-दिवाळीत इतर राज्यांमध्ये नारळाला मोठी मागणी असते. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्यामुळे दरात वाढ झाली आहे. नारळाच्या दरात वाढ झाल्याने खोबरे आणि खोबरेल तेलाचे दरही वाढले आहेत. दिवाळीपर्यंत हे दर असेच राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नारळ हे असे एकमेव फळ आहे ज्याची मागणी वर्षभर असते आणि दरात कितीही चढ-उतार आले तरी ते विकले जाते. त्यामुळे, महागाई वाढली असली तरी नारळाची मागणी कमी होणार नाही.
हे ही वाचा : महसूल विभाग 17 सप्टेंबरपासून शेतकऱ्यांसाठी राबवणार मोहीम, काय फायदा होणार?
हे ही वाचा : Lemon Rate: लिंबाचे दर घसरले! सोलापूर मार्केटमधून मोठं अपडेट, पिवळ्या लिंबाचा भाव काय?