चैत्रोत्सवात तुळजापुरात भाविकांची मोठी गर्दी असते. महाराष्ट्रभरातून भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. या काळात भाविकांना दर्शनाचा लाभ मिळावा, तसेच भाविकांचे हाल होऊ नयेत, यासाठी मंदिर 22 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मंदिर व्यवस्थापक तथा तहसीलदार माया माने यांनी सांगितले.
मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, उन्हाळी सुट्टीत अजमेर दर्शन सोपं, सोलापुरातून थेट ट्रेन, कधी धावणार?
advertisement
कधी घेता येईल दर्शन?
चैत्र पौर्णिमेनिमित्त मंदिराचे दरवाजे रोज रात्री 1 वाजता उघडले जातील आणि रात्री 11 वाजता बंद होतील. केवळ दोन तासांच्या विश्रांतीनंतर मंदिर दर्शनासाठी पुन्हा खुले राहणार आहे. त्यामुळे अनेक भाविकांना या काळात दर्शन घेता येईल. दर्शन सुलभ व्हावे यासाठी भाविकांना बिडकर पायरीमार्गे दर्शन मंडपात सोडले जाणार आहे.
दरम्यान, तुळजापुरात सध्या उन्हाचा कडाका वाढत आहे. यासाठी देखील मंदिर संस्थानकडून विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत. सुवर्णेश्वर गणपती ते महाद्वार चौक आणि संपूर्ण मंदिर परिसरात भव्य मंडप टाकण्यात येणार आहे. त्यामुळे रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना उन्हाचा त्रास होणार नाही. तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पाण्याची सोय देखील करण्यात येत आहे.
