प्रवाशांची चांगलीच चढाओढ
शहराकडे कामानिमित्त आणि शिक्षणासाठी बरेच प्रवासी-विद्यार्थी सुटीच्या काळात घरी जात असतात. त्यामुळे येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांमुळे प्रवाशांचा चांगलीच गर्दी असते. दसरा-दिवाळीच्या काळात तर प्रवाशांची संख्या तर मोठी असते. रेल्वेगाड्यांमध्ये त्यावेळी चढाओढ मोठी असते. याच कालावधीत पर्यटकदेखील मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे मुंबई, दिल्ली आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या गाड्यांची आरक्षणे फुल्ल होतात.
advertisement
प्रवाशांना येतोय 'रिग्रेट'चा मेसेज
कोकण रेल्वेने तीन-चार महिन्याआधीच तिकीट बुक करण्याचा नियम केला आहे. मात्र तिकीट बुक करत असताना अवघ्या काही मिनिटांतच फुल्ल होत असतात. रेल्वेच्या अघिकृत वेबसाईटवर तिकीट बुक करताना वेटिंग लिस्टशिवाय रिग्रेटचाही मेसेज येत आहे.
रेल्वेचा नवीन नियम काय सांगतो?
रेल्वेचे तिकिट नव्या नियमानुसार 60 दिवस आधीच बुक करता येते. पूर्वी ही मुदत 120 दिवसांची होती. एका प्रवाशाला एकाच पीनआरवर 6 तिकिटं बुक करता येतात. ऑनलाईन बुक करत असताना ओटीपी आणि ओळपत्राची गरज असते. हा नवीन नियम 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू करण्यात आला आहे.
हे ही वाचा : मुलगा सौदागरकडून आईच्या जीवाचा सौदा, पत्नीसोबत मिळून हालहाल करून मारलं, धाराशिवमधील अमानुष घटना!
हे ही वाचा : Kolhapur News: गणेशोत्सव करावा की, टँकरमागे पळावं? कोल्हापूरात पाण्याची बोंबाबोंब; प्रशासन करतंय काय?
