TRENDING:

Leopard Attacks : बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी वनमंत्र्यांनी सुचवला भन्नाट उपाय, पण खरचं लागणार आहे का?

Last Updated:

अवघ्या दोन दिवसातच मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही बिबट्याच्या मुक्त संचाराच्या घटना उघड झाल्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : बिबट्यांनी राज्यभरात उच्छाद मांडलाय. अनेक गावं आणि लाखो लोक त्याच्या दहशतीत जगताहेत. यावर उपाय म्हणून राज्याच्या वनमंत्र्यांनी एक अजब फर्मान काढलंय. बिबट्यांना शेळ्या पुरवण्याची वनमंत्र्यांची आयडिया म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर ठरु शकतो महाराष्ट्रातील विविध भागात दररोज बिबट्यांचे हल्ले सुरू आहेत. अवघ्या दोन दिवसातच मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भातही बिबट्याच्या मुक्त संचाराच्या घटना उघड झाल्या.
Ambernath Leopard News: बिबट्या आला रे... डोंबिवलीनंतर आता अंबरनाथमध्येही दर्शन, प्रशासनाकडून शोध सुरू
Ambernath Leopard News: बिबट्या आला रे... डोंबिवलीनंतर आता अंबरनाथमध्येही दर्शन, प्रशासनाकडून शोध सुरू
advertisement

रायगडच्या नागावमध्ये मंगळवारी बिबट्यानं 6 जणांवर हल्ला केला. तर बुधवारी सकाळी नागपूरच्या पारडीत बिबट्यानं हल्ला करत, तब्बल 7 जणांना जखमी केलं. बिबट्यांच्या या मानवी वस्त्यांवरील हल्ल्याचे पडसाद अधिवेशनातही उमटले. आमदारांनी बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली.. पारडीतील हल्ल्यावरुन भाजप आमदारानंच वनविभागाच्या कारभारावर सवाल उपस्थित केले.

पुणे जिल्हा बिबट्यांची पंढरी

advertisement

राज्यातील जवळपास सगळ्याच भागांमध्ये बिबट्यांचा मुक्त संचार सुरू आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील किन्ही रस्त्यावर शेतात जाताना शेतकऱ्यांना बिबट्याचं दर्शन घडल्यानं दहशत पसरलीय. तिकडे पुणे जिल्हा तर बिबट्यांची पंढरीच बनलाय. पण, बिबट्यांच्या मुक्तसंचारानं शिरूर तालुक्यातील एकट्या पिंपरखेड परिसरात तिघांचा मृत्यू झाला. तर जुन्नरच्या वडगाव आनंदरमध्ये एक मादी आणि तिचे दोन बछडे वनविभागाच्या पिंजऱ्यातील कोंबड्यांवर हल्ले करताना कॅमेऱ्यात कैद झाले. महिनाभरात या परिसरातून तब्बल 22 बिबटे जेरबंद केले गेले.बिबट्यांच्या याच मुक्त संचार आणि हल्ल्यांच्या निषेधार्थ जुन्नरचे आमदार शरद सोनवणे थेट बिबट्याच्या वेशातच विधानभवनाच्या आवारात अवतरले.

advertisement

बकऱ्या आणि शेळ्या सोडण्याचं अजब फर्मान

बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यानं शेतकरी, सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशावेळी या गंभीर प्रश्नांवर गांभीर्यानं विचार होणं गरजेचं आहे. पण, जेव्हा हा प्रश्न वनमंत्र्यांना विचारला गेला, तेव्हा त्यांना बिबट्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी थेट बकऱ्या आणि शेळ्या सोडण्याचं अजब फर्मान सोडलंय.

शेळ्या- बकऱ्यांचा अपव्यय ठरणार?

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
स्वप्नांचा झाला 'लाल चिखल', टोमॅटोला भाव नसल्यामुळे 2.50 लाखांचं नुकसान, Video
सर्व पहा

खरंतर बिबट्यांची वाढती संख्या, त्यांचा मानवी वस्तीतील वावर आणि वाढले हल्ले याचं अभ्यासपूर्ण विश्लेषण करून, त्यावर पर्याय शोधले पाहिजे.. पण, वनमंत्र्यांचं फर्मान पाहता, तसं होताना दिसत नाही.. त्यामुळं आम्ही बिबट्यांचा गंभीर प्रश्नावर तज्ज्ञांची मतं जाणून घेतली. बिबट्यांच्या वाढती संख्येमुळं वारंवार मानव आणि बिबट्यांच्या संघर्ष होतोय. हा संघर्ष रोखण्यासाठी ठोस उपाययोजना होणं गरजेचं आहे. पण, वनमंत्री मात्र बिबट्यांना शेळ्या-बकऱ्यांचा पुरवठा करण्याचा विचार करतायेत. अशानं खरंच बिबट्यांचा गंभीर प्रश्न मार्गी लागणार आहे का? की हा फक्त पैशांचा आणि शेळ्या- बकऱ्यांचा अपव्यय ठरणार? असे अनेक सवाल यातून उपस्थित होतोय

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Leopard Attacks : बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी वनमंत्र्यांनी सुचवला भन्नाट उपाय, पण खरचं लागणार आहे का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल