TRENDING:

Konkan Rain : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने दाणादाण; कोकणाला ऑरेंज अलर्ट, पुढील काही तास महत्त्वाचे

Last Updated:

Konkan Rain : रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले आहे. पुढील काही तास असाच पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रत्नागिरी, 1 ऑक्टोबर (शिवाजी गोरे, प्रतिनिधी) : एकीकडे परतीच्या पावसाचे वारे वाहत असताना, दुसरीकडे हवामान विभागाने येत्या 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील 48 तासात मुसळधार पाऊस कोसळेल, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील काही तासात जोरदार पाऊस बरसेल असा अंदाज आहे. आज सकाळपासूनच रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. परिणामी अनेक गावांना पुराचा वेढा बसला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने दाणादाण
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने दाणादाण
advertisement

कोकण किनारपट्टीला हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टीला हवामान विभागाने ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. कोकण किनारपट्टीवर समुद्राच्या लाटा अति वेगाने येत असल्याने किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. जिल्ह्यात बारा तासाहून अधिक काळ जोरदार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र, समुद्रातसुद्धा मोठ्या प्रमाणात नैसर्गिक बदल आढळून येत असल्याने समुद्राला जोरदार करंट आहे. त्यामुळे समुद्र किनारपट्टीवरील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहे. तसेच कोणीही मासेमारीसाठी जाऊ नये, अशा सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

advertisement

अंजर्ल खाडीत 800 बोटी आश्रयाला

रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णै बंदरातील बोटी अंजर्ल खाडीत 800 आश्रयाला आल्या आहेत. समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थितीमुळे मासेमारीसाठी गेलेल्या बोटी सुरक्षित स्थळी परतल्या आहेत. काही बोटीने जयगड खाडीचा आसरा घेतला आहे तर काही बोटींनी अंजर्ल खाडीत आश्रय घेतला आहे. हर्णै बंदरात जेट्टी नसल्याने समुद्रातील वादळ सदृश्य परिस्थिती व चक्रीवादळासारख्या परिस्थितीत बोटी सुरक्षित स्थळी लावण्यासाठी खाडीचा आसरा घ्यावा लागत आहे. वातावरण शांत होईपर्यंत कोणीही मासेमारीला जाऊ नये, अशा प्रकारचे आदेश देण्यात आल्याने मासेमारी बोटी किनाऱ्यावर आल्या आहेत तर दुसरीकडे मासेमारी व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा दिल्याने जिल्ह्याची परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत मासेमारी बोटी किनाऱ्यावरच उभ्या असणार आहेत.

advertisement

वाचा - रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा तडाखा! केळशी गाव तिहेरी संकटात, पुराचा विळखा, दरडही कोसळली

ढगफुटी सदृश पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यातील कासवांचे गाव अशी ओळख असलेल्या मंडणगड तालुक्यातील वेळास गावाला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. ढगफुटी सदृश पाऊस पडत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. 1950 साली अश्या प्रकारे पाऊस पडून घरे वाहून गेली होती, त्याची पुनरावृत्ती होईल की काय अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. नदीतील गाळ न काढल्याने पुराचे पाणी नदीपात्रात बाहेर जाऊन वेळास गावाला पुराच्या पाण्याने विळखा घातल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. वेळास गावातील रस्ते पूर्णपणे जलमय झालेत, अनेकांच्या घरांमध्ये नदीच्या पुराचे पाणी घुसले आहे. एकीकडे समुद्राला मोठ्या प्रमाणात उधान आहे तर दुसरीकडे नदीच्या पुराचे पाणी थेट गावात शिरत असल्याने नागरिक अडकले आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Konkan Rain : रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने दाणादाण; कोकणाला ऑरेंज अलर्ट, पुढील काही तास महत्त्वाचे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल