मोठा अपघात टळला
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जळगावहून पाचोरा तालुक्यातील बांबरुड गावाला जाण्यासाठी सायंकाळच्या सुमारास जळगाव बसस्थानकातून जळगाव डेपोची बस निघाली होती . या बसने जळगाव सोडल्यानंतर शिरसोली गावाजवळ बसच्या पुढील चाकाजवळचा रॉड तुटला, त्यामुळे चालकाचे स्टेरींगवरील नियंत्रण सुटले. मात्र समयसूचकता दाखवत चालक हेमंत पाटील यांनी पुन्हा बसवर नियंत्रण मिळवत बस रस्त्याच्या कडेला उभी केली. पाटील यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आहे.
advertisement
प्रवाशांचा संताप
या प्रसंगानंतर प्रवाशांनी चालक हेमंत पाटील यांचा सत्कार केला. टाळ्या वाजवून आणि त्यांना श्रीफळ देऊन त्यांचं कौतुक करण्यात आलं. दरम्यान या घटनेनंतर एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली. मात्र काही अतंर गेल्यानंतर ती देखील बंद पडली त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. दुसरी बस मागितल्याचा रागातून एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं चालकासह प्रवाशांना शिवीगाळ केली असा आरोपही या प्रवाशांकडून करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्याविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
