गेल्या दोन दिवसांपासून राजमल लखीचंद ज्वेलर्स समूहावर येडीची कारवाई सुरू होती आज पहाटे ही कारवाई संपली. या कारवाईनंतर ईश्वरलाल जैन यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. राजमल लखीचंद ज्वेलर्स समूहावर इडी ने छापेमारी करत कारवाई केली. राजमल लखीचंद ज्वेलर्स समूहाच जळगाव शहरातील मुख्य जे शोरूम आहे त्या ठिकाणाहून 87 लाखांची रोकड आणि त्याठिकाणी विक्रीसाठी असलेले सर्व दागिने जप्त करण्यात आले आहे. ईडीची ही कारवाई चुकीची आहे मात्र त्याबाबत कायदेशीर पद्धतीने लढा दिला जाईल असे यावेळी ईश्वरलाल बाबूजी जैन यांनी स्पष्ट केलं.
advertisement
सामनाची आग थांबवावी लागेल, अग्रलेखामुळे भाजप आक्रमक; बावनकुळेंनी दिला इशारा
ईश्वरलाल जैन व त्यांच्या पत्नी तसेच मनीष जैन व त्यांच्या पत्नी अशा चार जणांना ईडीच्यावतीने समन्स बजावण्यात आले आहे. आम्ही काही चुकीचे केलेले नाही त्यामुळे आम्ही समन्स बजावल्यानुसार चौकशीसाठी जाणार आहोत. राजकीय दबावतून ही कारवाई झाली असं मला वाटत नाही कारण तसा कुठलाही पुरावा नाही त्यामुळे विना पुरावा असं बोलणं उचित होणार नाही असंही ईश्वरलाल जैन यांनी म्हटलं.
