TRENDING:

Jalna News : जालन्यात 17 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी; अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Last Updated:

मोठी बातमी समोर येत आहे. जालना जिल्ह्यात आजपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
जालना, 4 सप्टेंबर, रवी जैस्वाल : मोठी बातमी समोर येत आहे. जालना जिल्ह्यात आजपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. येत्या 17 सप्टेंबरपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजानं सुरू केलेल्या आंदोलनामध्ये लाठीचार्ज झाला. त्यानंतर वातावरण चांगलंच तापलं असून, जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आजपासून जालना जिल्ह्यात कलम 144 नुसार जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
News18
News18
advertisement

जालन्यात तणावपूर्ण शांतता 

अप्पर जिल्हाधिकारी केशव नेटके यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार जालना जिल्ह्यात आजपासून येत्या 17 सप्टेंबरपर्यंत कलम 144 अतंर्गत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातही तणावपूर्ण शांतता असून, अंबड चौफुलीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राज्यात तिसऱ्या दिवशीही आंदोलन 

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: हळदीनं मार्केट खाल्लं, डाळिंब अन् आल्याला किती मिळाला भाव?
सर्व पहा

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याची घटना घडली होती. यानंतर आंदोलक चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यभरातून या लाठीचार्जचा निषेध करण्यात येत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी राज्यात आंदोलन सुरू आहे. अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला आहे. याचा मोठा फटका हा एसटी वाहतुकीला बसला आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Jalna News : जालन्यात 17 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी; अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल