सोलापूर-विजापूर महामार्गावरील वाहतूक 30तासांपासून बंद, वाहनांच्या लांबच लांब रांगा
गणेशोत्सवाच्या काळात कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहणाऱ्या 'लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ'ने पूरग्रस्त शेतकऱ्यांना 'एक हात मदतीचा' दिला आहे. या वाईट आणि कठीण काळामध्ये तुम्ही एकटे नसून आम्हीही तुमच्या सोबत असल्याचे गणेश मंडळाने दाखवून दिले आहे. महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये आस्मानी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणीही पळवलंय. अनेकांच्या घराची नासधूस झालेली असताना अतिवृष्टीबाधितांसाठी लालबागच्या राजा मंडळाने 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकर्यांचं नुकसान मोजता येणं शक्य नाही. पण प्रत्येकाकडून फूल नाही तर फुलाची पाकळी मदत व्हावी, अशी आशा सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
advertisement
रेल्वे स्थानकावर स्टॉलवाले तुम्हाला चॉकलेट देतात, 1 रुपयाचा करताय 'स्कॅम'!
मराठवाड्यात आलेल्या महाप्रलयामुळे अनेक जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. मोठ्या ओल्या दुष्काळाला तेथील शेतकरी आणि नागरिक सामोरे जात आहेत. लालबागचा राजा मंडळातर्फे या अतिवृष्टीबाधितांसाठी ५० लाख रूपयांची मदत घोषित केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन लवकरच या रकमेचा धनादेश सुपूर्द करणार आहोत, अशी माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, अतिवृष्टीबाधितांना 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'च्या माध्यमातून सरकारकडून मदतीचा हात देण्यात येत आहे. अजित पवार गटाचे सर्व आमदार- खासदार, शिंदेसेनेचे सर्व मंत्री आणि आमदार शिवाय भाजपचे आमदार, खासदार एक महिन्याचे वेतन जमा करणार आहेत. तसेच दीड लाख राजपत्रित अधिकार्यांच्या सप्टेंबर महिन्याच्या वेतनातील एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा राजपत्रित अधिकारी महासंघाचा निर्णय समोर आला आहेत. शिवाय, बहुतांश सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनीही एक दिवसाचे निवृत्तीवेतन देण्याचा मनोदय व्यक्त केला.