ऋषिकेशचे परीक्षा केंद्र दुसऱ्या तालुक्यात होते. ते अंतर जास्त होते. वडिलांवर अंत्यसंस्कार करून पुन्हा पेपर देण्यासाठी जाणं शक्य नव्हतं. शिक्षण विभागाला याबाबत कळवल्यानंतर योग्य त्या परवानग्या देत त्याची गावातीलच केंद्रावर परीक्षेची सोय करण्यात आली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अहमदपूर तालुक्यातील ढाळेगाव इथला ऋषिकेश पुरी हा लातुर तालुक्यात बोरी सलगरा बुद्रुक इथं मामाकडे शिक्षणासाठी राहतो. दहावीच्या परीक्षेसाठी त्याचे केंद्र बोरी इथं होते. पण गुरुवारी सायंकाळी त्याच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. ऋषिकेश त्याच्या गावी रात्री पोहोचला. तर वडिलांवर अंत्यसंस्कार शुक्रवारी सकाळी करण्यात आले.
advertisement
वडिलांवर सकाळी १०.३० वाजता अंत्यसंस्कार केल्यानंतर ऋषिकेशचे परीक्षा केंद्र १०० किमी दूर होते. त्यामुळे पेपर देता येणार नाही असं त्याला वाटलं. वडिलांच्या निधनामुळे त्याची मानसिक स्थितीही नव्हती. पण नातेवाईकांनी शिक्षण विभागाला ही अडचण कळवली. त्यानंतर शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऋषिकेशची भेट घेत त्याला सर्व परवानग्या मिळवून देत जवळच्या परीक्षा केंद्रात पेपर देण्याची सोय केली.
वडिलांचे निधन गुरुवारी सायंकाळी झाले. त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार केले गेले. त्यानंतर तासाभरात वडिलांचे अंत्यदर्शन घेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर ऋषिकेश परीक्षेला गेला.
