राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाच जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आमचं संपूर्ण नुकसान तर भरून निघणार नाही परंतु यामुळे काहीसा दिलासा नक्कीच मिळेल अशी भावना गोपाल खरात या युवा शेतकऱ्याने बोलून दाखवली. सरकार हेक्टरी 50 हजार रुपये मदतीची आम्हाला अपेक्षा आहे. कारण आमचा तेवढा खर्च झाला आहे. आमचं हाता तोंडाशी आलेलं पीक वाया गेला आहे. त्यामुळे सरकारकडून जास्तीच्या मदतीची अपेक्षा होती.
advertisement
परंतु सरकारने फुलला फुलाची पाकळी आमच्या पदरात टाकली आहे. त्यामुळे आम्ही सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे समाधानी असल्याचं लक्ष्मण खरात या शेतकऱ्याने सांगितलं. दरम्यान राज्य सरकारने जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांसाठी 47 हजार रुपये प्रति हेक्टर दुधाळ जनावरांसाठी प्रति जनावर 37 हजार रुपये फळबागेसाठी 32 हजार पाचशे रुपये बागायती पिकांसाठी 27 हजार पाचशे तर कोरडवाहू पिकांसाठी 18500 एवढ्या मदतीची घोषणा केली आहे.