तर आष्टी मधून सुरेश धस हे 75 हजारांपेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत. बीडमध्ये संदीप क्षीरसागर हे 5000 पेक्षा अधिक मताधिक्य घेऊन विजयी झाले आहेत. गेवराईमध्ये विजयसिंह पंडित, केजमध्ये नमिता मुंदडा तर माजलगावमध्ये प्रकाश सोळंके यांचा विजय झालेला आहे. बीड जिल्ह्यामध्ये महायुतीला पाच तर महाविकास आघाडीला केवळ एकाच जागेवरती समाधान मानावे लागले आहे. बीड लोकसभा मतदारसंघात बीडचा खासदार बदलण्यातही मराठा आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा ठरला. त्यामुळे विधानसभेला काय होणार हा मोठा प्रश्न होता. पण जनतेनं महायुतीची साथ दिली आहे.
advertisement
Maharashtra Election Results: 1990 नंतर राज्यात पहिल्यांदाच असं घडलं, जे भाजपलाही अपेक्षित नव्हतं
बीड जिल्ह्यातील विजयी उमेदवार
- परळी : धनंजय मुंडे - विजयी Vs राजेसाहेब देशमुख (NCP-SP)
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट (1,40,000 मताधिक्य)
- बीड : संदीप क्षीरसागर - विजयी
Vs योगेश क्षीरसागर (NCP- AP), अनिल जगताप (ज्योती मेटे शिवसंग्राम संघटना)
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट (5,000 पेक्षा अधिक मताधिक्य)
- आष्टी : सुरेश धस,
भाजप ( 75000 पेक्षा अधिक मताधिक्य)
- गेवराई : विजयसिंह पंडित
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ( 42,000 अधिक मताधिक्य)
- केज : नमिता मुंदडा, भाजप (2700 )
- माजलगाव : प्रकाश सोळुंके,
- राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ( 5000 पेक्षा मताधिक्य)
- पक्षीय बलाबल
- भाजप-2 (केज, आष्टी)
- NCP AP -3(परळी, गेवराई,माजलगाव)
- NCPSP- 1 (बीड )
