राज्यात थंडीचा जोर वाढणार
विदर्भ आणि मराठवाड्यात ९ ते १२ डिसेंबरपर्यंत थंडीच्या तीव्र लाटेचा परिणाम जाणवणार आहे. थंडीच्या या तीव्र लाटेमुळे किमान तापमान लक्षणीयरीत्या घट होईल. मध्य महाराष्ट्रात १० ते १२ डिसेंबरदरम्यान मध्य महाराष्ट्रातही काही ठिकाणी शीत लहरीची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील तापमानात पुढील ४ दिवसांत २ ते ३ अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे.
advertisement
देशाच्या उत्तर-पश्चिम भागातील मैदानी प्रदेशात ९ ते १२ डिसेंबर या काळात थंडीच्या लाटेचा नवा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. यात पंजाब, हरियाणा आणि उत्तर राजस्थानचा समावेश आहे. मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, विदर्भ या भागांत ९ ते १२ डिसेंबरपर्यंत शीत लहरीचा प्रभाव कायम राहील. महाराष्ट्रातील किमान तापमान पुढील ४ दिवसांत २ ते ३ अंश सेल्सिअसने खाली येईल. त्यानंतर पुढील तीन दिवस तापमानात मोठे बदल अपेक्षित नाहीत.
धुळ्यात सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. 5 अंशांपर्यंत तापमान खाली आलं आहे. तर निफाडमध्ये देखील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यवतमाळ, पुणे, जळगाव, महाबळेश्वर, नाशिक, सातारा, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, भंडारा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, नागपूर आणि वाशीम या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा घसरला असून कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. किमान तापमानात घट झाल्याने हाडं गोठवणारी थंडी वाढली आहे.
वर्धा, नागपूर आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांत येत्या 48 तासात तीव्र थंडीची लाट येईल असा इशारा हवामान तज्ज्ञ उमाशंकर दास यांनी दिला आहे. त्यामुळे या भागातील लोकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. या तिन्ही जिल्ह्यात तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे सतर्क राहावं, शेतकऱ्यांना देखील पिकाळी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
