काँग्रेसला 'विरोधी पक्षनेते' पद गमावण्याची धास्ती
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे सध्या राज्यसभेत विरोधी पक्षनेते आहेत. हे पद टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेसला दोन जागा निवडून आणणे अनिवार्य आहे. तेलंगणातून एक जागा निश्चित असली तरी महाराष्ट्रातील दुसरी जागा मिळवणे काँग्रेससाठी अस्तित्वाचा प्रश्न बनला आहे. जर ही जागा शरद पवारांना दिली आणि त्यांनी भविष्यात राजकीय भूमिका बदलली, तर काँग्रेसच्या हातून हे महत्त्वाचे पद जाऊ शकते. म्हणूनच, ही जागा पृथ्वीराज चव्हाण किंवा बाळासाहेब थोरात यांच्यासाठी राखली जावी, असा काँग्रेस नेत्यांचा आग्रह आहे. काँग्रेसने आपली अडचण ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवली असल्याची चर्चा आहे.
advertisement
ठाकरे गटात अंतर्गत कलह?
खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांच्या उमेदवारीची परस्पर घोषणा केल्यामुळे आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षात चर्चा न करता निर्णय जाहीर करणे योग्य नाही, अशी भूमिका युवा नेत्यांनी घेतल्याचे समजते. आदित्य ठाकरे यांना प्रियांका चतुर्वेदींना पुन्हा राज्यसभेवर पाठवायचे होते. मात्र, काँग्रेस नेत्यांनी आमची सध्याची निकड लक्षात घेऊन पाठिंबा द्यावा अशी भूमिका घेतली आहे.
ठाकरे गटातही तूर्तास आता काँग्रेसला राज्यसभेसाठी पाठिंबा द्यावा आणि विधान परिषदेला आपल्याला पाठिंबा घ्यावा असा प्रस्ताव मांडला आहे. राज्यसभेच्या पुढील टर्मसाठी संजय राऊत यांच्या वेळी काँग्रेसचा पाठिंबा घेता येईल असेही ठाकरे गटातील काहींना वाटत असल्याचे वृत्त समोर आले आहे.
र काँग्रेसची निकड पाहता शिवसेनेत आता राज्यसभा काँग्रेसला सोडून विधान परिषद पद पदरात पाडून घेणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
