दरम्यान राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर आता माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांचे हे विधान माझ्यासंदर्भात असेल तर ते हास्यास्पद आहे. मी कधीही सोनिया गांधी यांना भेटलो नाही. त्यामुळे मी सोनिया गांधी यांना भेटून माझी भावना व्यक्त केली हे वक्तव्य दिशाभूल करणारं असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे.
advertisement
पुढे बोलताना ते म्हणाले की, मी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस पक्षाचं काम करत होतो. मी पक्ष सोडेपर्यंत कोणालाही माहिती नव्हती, हे वास्तव आहे. त्यामुळे राहुल गांधी यांचं विधान माझ्या संदर्भात असेल तर ते चुकीचं आहे. दरम्यान काँग्रेसच नव्हे तर इतर पक्षाचे नेतेही भीतीपोटी भाजपात प्रवेश करत आहेत असाही आरोप करण्यात आला होता. याबाबत चव्हाण यांना विचारले असता, ते म्हणाले की मी इतरांबाबत बोलणार नाही. माझाबद्दल मी सांगतो, भाजपात भविष्य आणि भवितव्य असल्यामुळे मी प्रवेश केला.