नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
'ते विधान बदलतील, नाही तर 24 डिसेंबरपर्यंत पाहू. थोडा धीर धरा अमाचंही बारीक लक्ष आहे.
आमचं बारकाईने लक्ष सरकारकडे आहे. एकट्याच्या दबावाखाली फडणवीस यांनी पडू नये. मराठा काय आहे ते 24 डिसेंबरनंतर कळेल. आमचा संयम तुम्ही पाहत आहात.
गुलाल लावण्याचं आणि गुलाल न पडू देण्याची ताकद मराठ्यात आहे . ते स्टेटमेंट बदलतील, 100 टक्के बदलतील, ते पूर्वीच्या भूमिकेवर येतील, जर नाही बदलले तर 24 डिसेंबरनंतर कळेल.' असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
advertisement
दरम्यान मराठवाड्यात कुणबीच्या नोंदी कमी प्रमाणात आढळून येत आहेत. यावर देखील मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'नांदेड, संभाजीनगर, लातूर, या जिल्ह्यांत नोंदी कमी आढळून येत आहेत, त्याच कारण अधिकारी लक्ष देत नाहीत.अभ्यासक नाहीयेत. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलणार' असल्याचं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.