26 मार्च ते 3 एप्रिल या दिवसांमध्ये चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांना विशेष सवलत मिळणार आहे. भाविकांना सुलभ प्रवासासाठी एकूण 250 अतिरिक्त बसेसची सुविधा करण्यात आलेली आहे. प्रत्येकी दहा मिनिटाला सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी एक बस उपलब्ध असणार आहे. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळत आहे. यात्रेकरूंना कोणतीही अडचणी येऊ नये, यासाठी प्रमुख ठिकाणी विशेष वाहतूक केंद्र उभारण्यात येणार आहेत. निमाणी बसस्थानकावरून आणि नांदुरी पायथ्याच्या इथून प्रवाशांना सप्तश्रृंग गडावर जाण्यासाठी विशेष गाडीची सोय असणार आहे.
advertisement
या दोन्हीही बसेस थेट सप्तश्रृंग गडावरील वाहनतळापर्यंत प्रवाशांना पोहोचवणार आहे. त्यानंतर पुढे प्रवासी थेट देवीच्या दर्शनासाठी जाऊ शकणार आहेत. दरवर्षी फक्त दिंडोरी जिल्ह्यातूनच नाही तर, संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. ठरवण्यात आलेल्या ठिकाणापासून भाविकांसाठी अंतराप्रमाणे तिकिटाचे दर लागू करण्यात आलेले आहे. भाविकांना परवडणाऱ्या दरात सप्तश्रृंग गडावर देवीचे दर्शन करता येणार आहे. यात्रेच्या काळात वाढत्या गर्दीचा विचार करून एसटी प्रशासनाने ही विशेष व्यवस्था केलेली आहे.
नांदुरी ते सप्तश्रृंग गड या मार्गावर सर्वाधिक बसेस म्हणजेच 120 बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. निमाणी बस स्टँड ते सप्तश्रृंग गड या मार्गावर 65 बसेस, मालेगाव ते सप्तश्रृंग गड या मार्गावर 45 बसेस, मनमाड ते सप्तश्रृंग गड या मार्गावर 15 बसेस आणि सटाणा ते सप्तश्रृंग गड या मार्गावर 5 बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. यामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळालेला आहे.
