राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भाऊ भोसले यांनी, कामाचे तास वाढवण्याच्या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवला होता. सरकारने कामगार संघटनांशी चर्चा न करता थेट निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी सरकारचे कान टोचले. असा महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी कामगार संघटनांशी चर्चा होणे गरजेचं होतं, असे भोसले यांनी सांगितलं.
Pune Crime : मध्यरात्री प्रवाशांची लूट करायची रिक्षा गँग, फिल्मी स्टाइलने पोलिसांनी मुसक्या आवळल्या
advertisement
12 तासांची शिफ्ट अंमलात आणणे शक्य नाही
12 तासांची शिफ्ट प्रत्यक्षात अंमलात आणणे शक्य नाही, असं मत भोसले यांनी व्यक्त केलं. कामगारांना 12 तास काम करायला लावल्यास त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतील आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात घटतील, असंही ते म्हणाले. पुढील काळात कोणताही निर्णय घेताना सरकारने कामगार संघटनांशी चर्चा करूनच पावले उचलावीत, असा सल्ला यशवंत भोसले यांनी दिला आहे.
कामगारांच्या नियमांमध्ये बदल करण्यापूर्वी विशेष एसओपी तयार करून ती कामगार संघटनांकडे अभ्यासासाठी देण्यात येणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात आलं आहे. यात कामगारांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच सामाजिक सुरक्षा, आर्थिक स्थैर्य आणि कौटुंबिक अडचणींचा सर्वांगीण विचार करूनच सकारात्मक आणि हितकारक बदल केले जातील, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.