नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?
या आधी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिला होता. आता लेकरांना आरक्षण दिल्याशिवाय मागे हाटणार नाही. आंदोलन अजून जाहीर केलं नाही, मग विनाकारण नोटीस का? आमचं मुंबईला जायचं ठरलं तर तुम्हाला अडचण काय? लेकरांना अटक झाली तर सर्वांनीच पोलीस ठाण्यात जाऊन बसायचं, करायची तर सर्वांनाच अटक करा. सरकारला कायदा पारित करण्यात अडचण काय आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
advertisement
उद्या बीडमध्ये जरांगेंची इशारा सभा
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची 23 डिसेंबरला बीड शहरात पाटील मैदानावर इशारा सभा होणार आहे. सभेच्या स्थळावर तब्बल अकरा हजार झेंडे तर इतर ठिकाणी दहा हजार असे 21 हजार झेंडे या सभेसाठी लावण्यात आले आहेत. सभेची तयारी अंतीम टप्प्यात आल्याची माहिती संयोजकांकडून देण्यात आली आहे. सभेच्या पार्श्वभूमीवर सभास्थळ आणि बीड शहरात जागोजागी फ्लेक्स आणि बॅनर लावण्यात आले आहेत. या सभेमध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरणार असल्यानं सर्वाचं लक्ष या सभेकडे लागलं आहे.
