TRENDING:

मरण यावं तर असं...! विठू नामाचा गजर केला अन् देह ठेवला, परभणीतील वारकऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण!

Last Updated:

Warkari News: लक्ष्मण शक्तीच्या कथेचे सूचन करत असताना अभिमन्यू हे 'पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम'चा जयघोष करून बाजूला सरकले आणि त्याच ठिकाणी अखेरचा श्वास घेतला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
परभणी: पंढरीच्या पांडुरंगावर महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांची प्रचंड श्रद्धा आहे. त्यामुळे अवघं आयुष्य पांडुरंगाला वाहिल्याची धारणा असते. तसेच कधी मृत्यू आलाच तर तो पंढरीच्या वाटेवर किंवा ‘पांडुरंगाचं नामस्मरण’ करताना यावा, असं अनेकांना वाटतं. परभणीत अशाच एका विठ्ठल भक्तानं 'पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम'चा जयघोष करूनच जीव सोडला. ह.भ.प. अभिमन्यू अंबाजी मुंडे असं 74 वर्षीय त्यांचं नाव आहे.
मरण यावं तर असं...! विठू नामाचा गजर केला अन् देह ठेवला, 'अभिमन्यू' यांनी आधीच सांगितली होती शेवटची इच्छा!
मरण यावं तर असं...! विठू नामाचा गजर केला अन् देह ठेवला, 'अभिमन्यू' यांनी आधीच सांगितली होती शेवटची इच्छा!
advertisement

परभणी तालुक्यातील तट्टूजवळा येथे रामायण कथेचा लक्ष्मण शक्ती कार्यक्रम सुरू होता. कथा सूचक ह.भ.प. अभिमन्यू अंबाजी मुंडे यांनी 'पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम'चा जयघोष करत अखेरचा श्वास घेतला. शनिवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पांडुरंगाच्या वारकऱ्याला विठू नामाचा गजर करतानाच मृत्यू आल्याची पंचक्रोशीत चर्चा आहे.

'खाकी'चं स्वप्न मैदानावरच तुटलं! 1400 मीटर धावला, फक्त 200 मीटरवर होतं ध्येय, पण पुण्याच्या मैदानातच तरुणाचे ठोके थांबले

advertisement

अभिमन्यू मुंडे यांनी परभणी पोलिस दलात 35 वर्षे सेवा बजावली. त्यानंतर सन 2011 साली ते सेवानिवृत्त झाले. गेल्या काही वर्षांत ते जिल्ह्यातील विविध ठिकाणी कथा सूचक म्हणून सेवा देत होते. तट्टूजवळा येथे रामायण कथेचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी देखील अभिमन्यू मुंडे हे कथा सूचक म्हणून हजर होते.

लक्ष्मण शक्तीच्या कथेचे सूचन करत असताना अभिमन्यू हे 'पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम'चा जयघोष करून बाजूला सरकले आणि त्याच ठिकाणी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने परभणीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी मृत घोषित केले.

advertisement

शेवटची इच्छा पूर्ण

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात लिंबूचे दर तापले, कांद्याला सरासरी दर, APMC मार्केटमधून नवी अपडेट
सर्व पहा

दरम्यान, अभिमन्यू यांची शेवटची इच्छा ही कथा सांगतानाच मृत्यू यावा अशी होती. मरण आलं तर पांडुरंगाचं नामस्मरण करताना यावं असं ते म्हणायचे, असं कुटुंबीयांनी सांगितले. आता त्यांची ही इच्छा पूर्ण झाल्याची पंचक्रोशीत चर्चा आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/परभणी/
मरण यावं तर असं...! विठू नामाचा गजर केला अन् देह ठेवला, परभणीतील वारकऱ्याची शेवटची इच्छा पूर्ण!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल