काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून नांदेड जिल्हा ओळखला जातो. सभा संपल्यानंतर राहुल गांधी थेट नांदेडच्या बस स्थानकात पोहोचले. यावेळी त्यांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती . त्या गर्दीतून वाट काढते बस स्थानकातील एका रसवंतीगृहात गेले . रसवंतीमध्ये असलेल्या महिलांशी त्यांनी आपुलकीने संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या .त्यांना महालक्ष्मी योजना आणि काँग्रेस आघाडीच्या योजनांची माहिती दिली . राहुल गांधी यांना भेटून आनंद झाला अशी प्रतिक्रिया या महिलांनी दिली .
advertisement
राहुल गांधी महिलांना काय म्हणाले?
राहुल गांधींनी यावेळी महिलांशी संवाद साधला. त्यावेळी महिलांनी महागाई आणि बेरोजगारीविषयी राहुल गांधींना सांगितले. तसेच राहुल गांधींनी यावेळी महाविकास आघाडीच्या महालक्ष्मी योजनेविषयी देखील सांगितले. महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात 3000 रुपये येणार, महिलांना राज्यात मोफत प्रवास करता येणार आहे असे देखील राहुल गांधींनी सांगितले.
राहुल गांधींना पाहण्यासाठी महिलांची गर्दी
रसवंतीगृहात राहुल गांधी अचानक गेल्याने यंत्रणांची मोठी धावपळ झाली. नांदेडच्या बसस्थानक गप्पा मारल्यानंतर राहुल गांधींनी बस स्थानकातील नवनाथ रसवंतीगृहाला भेट दिली. राहुल गांधी अचानक आल्याचे पाहून रसवंतीगृहातील लोकांना देखील काही काळ विश्वास बसत न्हवता. राहुल गांधी यांनी नांदेड बस स्थानकात जवळपास अर्धा तास तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान राहुल गांधींनी देखील थेट रसवंतीगृह गाठत ऊसाच्या रसाचा आस्वाद घेतला. यावेळी राहुल गांधी आल्याचे कळताच परिसरातील नागरिकांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केली.
