रामदार कदम म्हणाले , मी काल जे बोललो त्यावर ठाम आहे. बाळासाहेब ठाकरे माझे दैवत आहेत. दोन दिवस बाळासाहेब साहेब ठाकरे यांच्या बॉडीचा छळ उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मी हे जबाबदारीने पुन्हा बोलत आहे. उद्धव ठाकरेंनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवून खरं सांगावं. मी त्यांना बोललो बाळासाहेब यांच्या पायाचे ठसे घेऊन ठेवा हे दैवत आहे . तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले मी हाताचे ठसे घेऊन ठेवले आहेत. हे माझं आणि उद्धव ठाकरे यांच्यातलं सांभाषण आहे. मी काल ठरवून नाही बोललो ओघाओघाने बोललो , मी ज्या वेळी बोलले तेंव्हा मातोश्रीला हदरा बसेल.
advertisement
शरद पवारांना खोलीबाहेरचं अडवलं : रामदास कदम
रामदास कदम यांनी या वेळी शरद पवारांचा देखील उल्लेख केला आहे. रामदास कदम म्हणाले, मी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत निष्टेने दिवस काढले आहेत. मीडियाने जावं डॉक्टरांना विचारावं, मी जे बोललो त्यावर मी ठाम आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर दोन दिवस कोणालाही वरती पाठवले नाही. शरद पवार यांना सुद्धा त्यांच्या खोलीमध्ये जाऊ दिलं नव्हतं. बाळासाहेबांच्या बॉडीला त्रास देताय ,मृतदेहाचे हाल का करता असे विचारलं होतं.
बाळासाहेबांच्या बॉडीचा दोन दिवस छळ : रामदास कदम
उद्धव ठाकरे कपटी आहेत. मी जे बोललो त्यावर उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावे. अंबादास दानवे काय मला शिकवणार शिवसेना, मी त्यांना निवडून आणलं. बाळासाहेबांच्या बॉडीचा दोन दिवस छळ केला. मी खोटं बोलतोय तर माझी आणि उद्धव ठाकरेंची नार्को टेस्ट होऊन जाऊ देत, असं आव्हान देखील रामदास कदम यांनी दिलं. बाळासाहेब ठाकरेंच्या हातांच्या ठसाचा उपयोग कशासाठी झाला, याबाबत उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं, असंही रामदास कदम म्हणाले.